शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला जम्मूतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:38 IST

माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह व्यापा-यांना गंडा घालणा-या गुन्हेगाराला जम्मू येथे भारत-पाक सीमेवरून अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह व्यापा-यांना गंडा घालणा-या गुन्हेगाराला जम्मू येथे भारत-पाक सीमेवरून अटक करण्यात आली आहे. या वेळी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दोघा पोलिसांना सीमेवरील गोळीबाराचा सामनाही करावा लागला.संजीवकुमार राजपुत (२६) असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जम्मूमधील नगोर गावचा राहणारा असून एपीएमसी आवारात मोठा व्यापारी म्हणून वावरत होता. या दरम्यान त्याने निवृत्त पोलीस अधिकारी ए. के. शर्मा यांचा मुलगा अजित शर्मा याच्यासह आठ ते दहा व्यापाºयांना गंडा घातला होता. जम्मूमधून सफरचंद व अक्रोड आणून देतो, असे सांगून तो उधारीवर अनेकांकडून इतर फळे घेऊन गेला होता. मात्र, त्या फळांची चंदिगड व परिसरात विक्री करून शर्मा व इतरांना त्याचे पैसे न देता फसवणूक केली होती. या प्रकरणी त्याच्यावर एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान राजपुत हा वैष्णोदेवी परिसरात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलीस हवालदार अशोक कचरे व रवींद्र सानप हे दोघेच जम्मूला गेले होते; परंतु तिथे पोहोचल्यावर राजपुत हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील त्याच्या नगोर गावी गेल्याचे समजताच तेही त्या गावाच्या दिशेने गेले. मात्र, हे गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने स्थानिक पोलिसांनीही मदतीसाठी हात वर केले. अखेर भारतीय सैन्याची मदत घेऊन ते राजपुतच्या अटकेसाठी रात्रीच्या अंधारात नगोर गावाकडे निघाले. या वेळी त्यांच्या वाहनांच्या लाइटचा प्रकाश पाहून पाकिस्तानच्या सीमेमधून त्यांच्यावर गोळीबार व तोफगोळे यांचा मारा होऊ लागला. त्यातून स्वत:चा बचाव करत ते सर्व जण राजपुतच्या घरी पोहोचले असता, त्या ठिकाणावरून तो पसार झालेला होता.दरम्यान, त्याच्या घराच्या झडतीमध्ये त्या ठिकाणी दारूचा अड्डाही चालत असल्याचे उघड झाले. यामुळे मुंबईवरून आलेले पोलीस हे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव केला, त्यानुसार वडिलांना सोडवण्यासाठी संजीवकुमार राजपुत येताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या वेळी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करत भारत-पाक सीमेपर्यंत पोहोचणाºया पोलीस हलवादार अशोक कचरे व रवींद्र सानप यांच्या धाडसाचे भारतीय सैन्यानेही कौतुक केले.