शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला जम्मूतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:38 IST

माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह व्यापा-यांना गंडा घालणा-या गुन्हेगाराला जम्मू येथे भारत-पाक सीमेवरून अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह व्यापा-यांना गंडा घालणा-या गुन्हेगाराला जम्मू येथे भारत-पाक सीमेवरून अटक करण्यात आली आहे. या वेळी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या एपीएमसी पोलीस ठाण्याच्या दोघा पोलिसांना सीमेवरील गोळीबाराचा सामनाही करावा लागला.संजीवकुमार राजपुत (२६) असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जम्मूमधील नगोर गावचा राहणारा असून एपीएमसी आवारात मोठा व्यापारी म्हणून वावरत होता. या दरम्यान त्याने निवृत्त पोलीस अधिकारी ए. के. शर्मा यांचा मुलगा अजित शर्मा याच्यासह आठ ते दहा व्यापाºयांना गंडा घातला होता. जम्मूमधून सफरचंद व अक्रोड आणून देतो, असे सांगून तो उधारीवर अनेकांकडून इतर फळे घेऊन गेला होता. मात्र, त्या फळांची चंदिगड व परिसरात विक्री करून शर्मा व इतरांना त्याचे पैसे न देता फसवणूक केली होती. या प्रकरणी त्याच्यावर एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान राजपुत हा वैष्णोदेवी परिसरात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलीस हवालदार अशोक कचरे व रवींद्र सानप हे दोघेच जम्मूला गेले होते; परंतु तिथे पोहोचल्यावर राजपुत हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील त्याच्या नगोर गावी गेल्याचे समजताच तेही त्या गावाच्या दिशेने गेले. मात्र, हे गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने स्थानिक पोलिसांनीही मदतीसाठी हात वर केले. अखेर भारतीय सैन्याची मदत घेऊन ते राजपुतच्या अटकेसाठी रात्रीच्या अंधारात नगोर गावाकडे निघाले. या वेळी त्यांच्या वाहनांच्या लाइटचा प्रकाश पाहून पाकिस्तानच्या सीमेमधून त्यांच्यावर गोळीबार व तोफगोळे यांचा मारा होऊ लागला. त्यातून स्वत:चा बचाव करत ते सर्व जण राजपुतच्या घरी पोहोचले असता, त्या ठिकाणावरून तो पसार झालेला होता.दरम्यान, त्याच्या घराच्या झडतीमध्ये त्या ठिकाणी दारूचा अड्डाही चालत असल्याचे उघड झाले. यामुळे मुंबईवरून आलेले पोलीस हे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव केला, त्यानुसार वडिलांना सोडवण्यासाठी संजीवकुमार राजपुत येताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या वेळी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करत भारत-पाक सीमेपर्यंत पोहोचणाºया पोलीस हलवादार अशोक कचरे व रवींद्र सानप यांच्या धाडसाचे भारतीय सैन्यानेही कौतुक केले.