शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

बंदीनंतरही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:25 IST

आरटीओची डोळेझाक; परिवहनमंत्र्यांचे आदेश कागदावरच

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून होणारी मालवाहतूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पनवेल येथे एसटीच्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र, आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अद्यापही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक होताना दिसत आहे.

पनवेलच्या आपटा बस आगारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये आयईडी बॉम्ब आढळल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. सुदैवाने अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच ही बाब उघड झाल्याने संभाव्य हानी टळली. मात्र, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खासगी तसेच राज्य परिवहनच्या प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर तत्काळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून मालवाहतुकीला आळा बसणे आवश्यक होते; परंतु बंदीच्या निर्णयाला नऊ महिने उलटले तरीही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हल्समधून होणाऱ्या या मालवाहतुकीला आरटीओसह संबंधित सर्वच प्रशासनाचे अर्थपूर्ण छुपे पाठबळ मिळत असल्याची दाट शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. त्यामध्ये कुरियरच्या मालासह कृषी माल व इतर साहित्यांचाही समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करून दुहेरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने बहुतांश ट्रॅव्हल्स चालवल्या जात आहेत. त्यांचे नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व मुंबई परिसरात प्रवासी व माल भरण्याचे थांबेही ठरले आहेत.

ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे ट्रक अथवा कंटेनरमधून मालवाहतूक करण्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. गतमहिन्यात नवी मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल्समधूनशहरात विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त केला होता. नियमितपणे हा गांजा ट्रॅव्हल्समधून आणला जायचा हेही तपासात उघड झाले होते. त्याशिवाय ज्वलनशील पदार्थांसह दुचाकीचीही बसच्या डिकीमधून वाहतूक होताना दिसून येत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करण्यावरही ट्रॅव्हल्सचालकांकडून भर दिला जात आहे.

अशाच प्रकारातून २०१६ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व कारच्या अपघातात १७ जण मृत पावले होते. तर इतरही छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाची आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. त्याकरिता अवैध थांबे बंद करण्यासह ट्रॅव्हल्सची नियमित झडती घेतली जाणे आवश्यक आहे.