शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बंदीनंतरही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:25 IST

आरटीओची डोळेझाक; परिवहनमंत्र्यांचे आदेश कागदावरच

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून होणारी मालवाहतूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पनवेल येथे एसटीच्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र, आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अद्यापही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक होताना दिसत आहे.

पनवेलच्या आपटा बस आगारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये आयईडी बॉम्ब आढळल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. सुदैवाने अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच ही बाब उघड झाल्याने संभाव्य हानी टळली. मात्र, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खासगी तसेच राज्य परिवहनच्या प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर तत्काळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून मालवाहतुकीला आळा बसणे आवश्यक होते; परंतु बंदीच्या निर्णयाला नऊ महिने उलटले तरीही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हल्समधून होणाऱ्या या मालवाहतुकीला आरटीओसह संबंधित सर्वच प्रशासनाचे अर्थपूर्ण छुपे पाठबळ मिळत असल्याची दाट शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. त्यामध्ये कुरियरच्या मालासह कृषी माल व इतर साहित्यांचाही समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करून दुहेरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने बहुतांश ट्रॅव्हल्स चालवल्या जात आहेत. त्यांचे नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व मुंबई परिसरात प्रवासी व माल भरण्याचे थांबेही ठरले आहेत.

ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे ट्रक अथवा कंटेनरमधून मालवाहतूक करण्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. गतमहिन्यात नवी मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल्समधूनशहरात विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त केला होता. नियमितपणे हा गांजा ट्रॅव्हल्समधून आणला जायचा हेही तपासात उघड झाले होते. त्याशिवाय ज्वलनशील पदार्थांसह दुचाकीचीही बसच्या डिकीमधून वाहतूक होताना दिसून येत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करण्यावरही ट्रॅव्हल्सचालकांकडून भर दिला जात आहे.

अशाच प्रकारातून २०१६ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व कारच्या अपघातात १७ जण मृत पावले होते. तर इतरही छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाची आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. त्याकरिता अवैध थांबे बंद करण्यासह ट्रॅव्हल्सची नियमित झडती घेतली जाणे आवश्यक आहे.