शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:25 IST

आरटीओची डोळेझाक; परिवहनमंत्र्यांचे आदेश कागदावरच

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून होणारी मालवाहतूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पनवेल येथे एसटीच्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र, आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अद्यापही ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक होताना दिसत आहे.

पनवेलच्या आपटा बस आगारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये आयईडी बॉम्ब आढळल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. सुदैवाने अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच ही बाब उघड झाल्याने संभाव्य हानी टळली. मात्र, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खासगी तसेच राज्य परिवहनच्या प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर तत्काळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून मालवाहतुकीला आळा बसणे आवश्यक होते; परंतु बंदीच्या निर्णयाला नऊ महिने उलटले तरीही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हल्समधून होणाऱ्या या मालवाहतुकीला आरटीओसह संबंधित सर्वच प्रशासनाचे अर्थपूर्ण छुपे पाठबळ मिळत असल्याची दाट शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. त्यामध्ये कुरियरच्या मालासह कृषी माल व इतर साहित्यांचाही समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक करून दुहेरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने बहुतांश ट्रॅव्हल्स चालवल्या जात आहेत. त्यांचे नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व मुंबई परिसरात प्रवासी व माल भरण्याचे थांबेही ठरले आहेत.

ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे ट्रक अथवा कंटेनरमधून मालवाहतूक करण्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक केली जात आहे. गतमहिन्यात नवी मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल्समधूनशहरात विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त केला होता. नियमितपणे हा गांजा ट्रॅव्हल्समधून आणला जायचा हेही तपासात उघड झाले होते. त्याशिवाय ज्वलनशील पदार्थांसह दुचाकीचीही बसच्या डिकीमधून वाहतूक होताना दिसून येत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करण्यावरही ट्रॅव्हल्सचालकांकडून भर दिला जात आहे.

अशाच प्रकारातून २०१६ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व कारच्या अपघातात १७ जण मृत पावले होते. तर इतरही छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाची आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. त्याकरिता अवैध थांबे बंद करण्यासह ट्रॅव्हल्सची नियमित झडती घेतली जाणे आवश्यक आहे.