शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

ईडीचा हस्तक्षेप दूर झाल्यास ठेवीदारांना पैसे मिळतील; विक्रम वैद्य यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 23:18 IST

पेण अर्बन बँक संघर्ष समितीची बैठक

कर्जत : ‘पेण बँक हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. २७ प्रकारचे गुन्हे यामध्ये समाविष्ट आहेत. आजमितीस ६११ कोटी रुपये ठेवीदारांना देणे असले, तरी बँकेकडील जप्त केलेल्या जमिनींची किंमत आठशे ते हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. आपण आत्तापर्यंत संचालकांना शिक्षा झाली पाहिजे. अशा अन्य विषयांवर आपण लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पैसे कसे मिळणार? याबद्दल आपल्याला दिशा मिळत नव्हती. आता आपण योग्य दिशेने जात आहोत. पेण, अलिबाग येथील न्यायालयात असलेत्या केसेस ईडीच्या न्यायालयात गेल्या पाहिजेत. त्यांचा हस्तक्षेप दूर झाल्यास ठेवीदारांचे पैसे निश्चित मिळतील,’ अशी माहिती सनदी लेखापाल विक्रम वैद्य यांनी दिली.

पेण अर्बन बँक संघर्ष समितीची बैठक अंबामाता सभागृहात मोहन सुर्वे, प्रदीप शहा व नगरसेवक बळवंत घुमरे यांनी आयोजित केली होती. वैद्य यांनी माहिती सांगताना, ‘आपले १४० कोटी रुपये दुबईत हवाल्यात गेले. १८ कोटी रुपयांना गुजरातमध्ये घेतलेली कंपनीही जप्त करण्यात आली आहे. १३ कोटी रुपयांचे फर्निचर केले आहे. विविध बोगस कंपन्यांची खाती उघडून पैसे काढले आहेत, पण आपल्यासाठी वाईटातून चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पैशांतून जमिनी विकत घेतल्या म्हणूनच त्या विकून आपले पैसे परत मिळू शकतील.

नवी मुंबईमध्ये असलेली ३५ एकर जमीन विकण्याची परवानगी मिळाल्यास तिची किंमतच ७५३ कोटी रुपये मिळू शकते आणि ठेवीदारांचे पैसे ६११ कोटी आहेत. मात्र, ईडी कडे सर्व केसेस गेल्यावर त्यातून मार्ग निघेल. आपल्या पैशांतून १६६ एकर जागा घेतल्याचे उघड झाले आहे. मी त्यासाठी विना मोबदला काम करीत आहे. त्याला निश्चित यश येईल आणि लवकरच याचा सोक्षमोक्ष लागेल,’ असे सांगितले.

सातत्याने पाठपुरावा

अध्यक्षीय मनोगतात शिरीष बिवरे यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच ठेवीदारांचे पैसे मिळतील, असा विश्वास असल्याने मी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, तसेच राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क करून विषय सकारात्मक केला आहे आणि तटकरेच यातून मार्ग काढतील, अशी खात्री आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई