शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पनवेलला अतिरिक्त पाणी देण्यास नकार

By admin | Published: June 21, 2017 5:52 AM

तीव्र पाणीटंचाई असल्याने पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तीव्र पाणीटंचाई असल्याने पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे केली होती. जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला आहे. यामुळे पनवेलकरांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पनवेल महापालिकेला स्वत:चा स्रोत नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी विविध संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेचे देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको क्षेत्रामध्ये महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पनवेल महापालिकेमधील कामोठे परिसराला नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जवळपास ३५ एमएलडी पाणी अनेक वर्षांपासून दिले जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. यामुळे पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेला पत्र देऊन पाच एमएलडी पाणी मिळावे, अशी विनंती केली होती. सुकापूर येथे १५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकून त्याद्वारे एप्रिल ते १५ जूनपर्यंत रोज ५ दशलक्ष पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पाणी देण्याविषयी अनुकुल भूमिका घेतली होती. मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी विकण्यास हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता; परंतु तेव्हा या विषयावर काहीही चर्चा झाली नव्हती. पनवेल महापालिका एमआयडीसीकडून एक हजार लिटरसाठी ९ रुपये या दराने पाणी घेत आहे. त्या दराने महापालिकेने पाणी देण्यास हरकत नाही. पालिकेने पुरविलेल्या पाण्याचा दुरुपयोग झाला. गैरवापर किंवा अपव्यय झाल्यास नळजोडणी खंडित करण्याची तरतूद प्रस्तावामध्ये होती. याशिवाय तीन महिन्यांसाठी अनामत रक्कमही घेण्यात येणार होती. महापालिकेच्या जून महिन्याच्या सभेमध्ये हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. या विषयावर एकही सदस्याने चर्चा केली नाही. बहुमताच्या बळावर सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे पनवेलकरांना अतिरिक्त पाणी मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. वास्तविक मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे.