शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पनवेलला अतिरिक्त पाणी देण्यास नकार

By admin | Updated: June 21, 2017 05:52 IST

तीव्र पाणीटंचाई असल्याने पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तीव्र पाणीटंचाई असल्याने पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी पनवेल महापालिकेने नवी मुंबईकडे केली होती. जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला आहे. यामुळे पनवेलकरांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पनवेल महापालिकेला स्वत:चा स्रोत नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी विविध संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेचे देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको क्षेत्रामध्ये महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पनवेल महापालिकेमधील कामोठे परिसराला नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जवळपास ३५ एमएलडी पाणी अनेक वर्षांपासून दिले जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. यामुळे पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेला पत्र देऊन पाच एमएलडी पाणी मिळावे, अशी विनंती केली होती. सुकापूर येथे १५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकून त्याद्वारे एप्रिल ते १५ जूनपर्यंत रोज ५ दशलक्ष पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पाणी देण्याविषयी अनुकुल भूमिका घेतली होती. मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी विकण्यास हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता; परंतु तेव्हा या विषयावर काहीही चर्चा झाली नव्हती. पनवेल महापालिका एमआयडीसीकडून एक हजार लिटरसाठी ९ रुपये या दराने पाणी घेत आहे. त्या दराने महापालिकेने पाणी देण्यास हरकत नाही. पालिकेने पुरविलेल्या पाण्याचा दुरुपयोग झाला. गैरवापर किंवा अपव्यय झाल्यास नळजोडणी खंडित करण्याची तरतूद प्रस्तावामध्ये होती. याशिवाय तीन महिन्यांसाठी अनामत रक्कमही घेण्यात येणार होती. महापालिकेच्या जून महिन्याच्या सभेमध्ये हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. या विषयावर एकही सदस्याने चर्चा केली नाही. बहुमताच्या बळावर सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे पनवेलकरांना अतिरिक्त पाणी मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. वास्तविक मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे.