शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

खुल्या टाक्यांमुळे डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: November 10, 2015 01:24 IST

शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे.

नवी मुंबई : शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. इमारतींवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, भंगार साहित्य व इतर ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक स्वत: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असून त्याचे खापर आरोग्य विभाग व नगरसेवकांवर फोडले जात आहे.नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पालिकेची माता बाल रूग्णालये बंद होवू लागली आहेत. नागरी आरोग्य केंद्रामधून प्रभावीपणे काम होत नाही. पूर्ण भार वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर पडू लागला आहे. योग्य उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्यापासून शहरात तापाची साथ सुरू झाली असून डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. बंद रूग्णालय, फसलेला सुपरस्पेशॅलिटीचा प्रयोग व नवीन रूग्णालय सुरू होण्यास लागणारा विलंब याचा सर्व राग नागरिक व लोकप्रतिनिधींनी डेंग्यू व मलेरिया नियंत्रण विभागावर काढण्यास सुरवात केली आहे. आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरियाचा फैलाव होवू नये यासाठी व्यापक जनजागृती सुरू केली आहे. पथनाट्य, आरोग्य शिबिर, माहितीपत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. टेरेसवर भंगार साहित्य व इतर वस्तू ठेवू नये याविषयी आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरामधील ७० टक्के इमारतींवरील पाणी साठविण्याच्या टाक्यांवर झाकणच नसते. झाकण नसल्यामुळे पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होवू लागली आहे. अनेक इमारतींवर असलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये असणाऱ्या साठवण टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नाहीत. याविषयी मनपा जनजागृती करत असूनही नागरिक योग्य काळजी घेत नाहीत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर महापालिकेने कितीही काळजी घेतली तरी साथ आटोक्यात येवू शकत नाही. वाशीमधील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही आरोग्याच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या समस्येकडे लक्ष वेधले होते. पाण्याच्या टाक्या उघड्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव होत आहे. नागरिकांनी टाक्या बंदिस्त कराव्या व जे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी असे मत व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)