पंकज पाटील ल्ल अंबरनाथठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणार का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र पक्षीय पातळीवर भाजपाची कोंडी करण्यासाठी सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा प्रयत्न जिल्हा पातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांनी आघाडी आणि युतीचा निर्णय घेण्याचे आदेश भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत युतीची शक्यता दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाला मिळालेले यश हे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना चांगलाच बोचत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीतही भाजपाने आपला दबदबा कायम ठेवल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपाचे हे यश अडचणीचे ठरणार आहे. भाजपाची ताकद ग्रामीण भागात वाढू न देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रयत्न करित आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीबाबत अद्याप निर्णय होत नाही. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पदाधिका-यांच्या एकत्रित गुप्त बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये केवळ भाजपाला कसे रोखावे हाच एकमेव मुद्दा पुढे येत आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीबाबत जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश पक्षाने दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्रित येऊ न भाजपाला रोखण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीचा निर्णय हा केवळ जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याची वेळ आल्यावर घेतला जाणार आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन युतीचे आदेश आल्यास जागा वाटपाचा घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा विचार सुरु असून ग्रामीण भागात भाजपाला उभारी देण्याची आणि भाजपाची ताकद अजमावण्याची संधी या निवडणुकीत मिळणार आहे. तर दुसरीकडे पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणत्या पक्षासोबत आघाडी करावा ह निर्णय घेण्याचे अधिकार सर्वच पक्षांच्या तालुका पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहे. तालुका पातळीवर जी परिस्थिती असले त्या प्रमाणे त्यांनी आघाडी किंवा युती करावे असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेने या तिन्ही पक्षांनी दिले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर आघाडी आणि युती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. चर्चेला दुजोरा; मात्र अंतिम निर्णय अद्याप नाही४शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत चर्चेबाबत राष्ट्रवादीच्या एका प्रदेश सरचिटणीसांना विचारले असता त्यांनी नाव न सांंगण्याच्या अटीवर या अंतर्गत चर्चेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पातळीवर या संदर्भात चर्चा सुरु असून अंतिम निर्णय अद्याप झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आघाडी-युतीचे निर्णय तालुुका पातळीवर होणार
By admin | Updated: January 9, 2015 22:59 IST