शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:51 IST

शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये आघाडी घेतली आहे. माझा कचरा माझी जबाबदारी, माझे शहर माझा अभिमान ही घोषवाक्ये घेवून शहरभर जनजागृती सुरू केली आहे. शहरात कुठेही कचºयाचे ढिगारे, डेब्रिज दिसले तर स्वच्छता अ‍ॅपवर फोटो पाठवा, चोवीस तासामध्ये कचरा साफ केला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखलही घेतली जात आहे. स्वच्छता अभियानासाठी अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारीही कर्मचाºयांना काम करावे लागत आहे. शहरभर अभियान प्रभावीपणे राबविणाºया प्रशासनाचे मुख्यालयातील कचºयाकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. कँटीनच्या बाहेरील बाजूला अनेक महिन्यांपासून डेब्रिजचा ढिगारा पडला आहे. पालिका अधिकारी व कर्मचारी रोज येथून ये - जा करत असूनही हा कचरा उचलण्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. व सर्व अधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन, बस डेपो, प्रत्येक विभागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत फिरत आहेत. परंतु अधिकाºयांना मुख्यालय परिसराचा दौरा करण्यास अधिकाºयांना वेळ नाही असे चित्र निर्माण झाले आहे. डेब्रिज कधी उचलले जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील मोठा भाग अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या माळ्यावर जमिनीवर लादीही टाकण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे चित्र आहे. विविध विभागांमध्ये कोपºयामध्ये कुठेही फाईलचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. मुख्यालयामध्ये साफसफाई चांगली होत असली तरी डेब्रिज व इतर कचरा कधी हटविला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेचे विभाग कार्यालय, रुग्णालय व शाळांच्या इमारतींमध्ये अनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पडले आहे. काही इमारतींच्या बाहेरील ठिकाणी भंगार गोडाऊनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे शहर स्वच्छतेला बाधा येऊ लागली आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रशासनाने स्वत:च्या इमारती व परिसर प्रथम स्वच्छ ठेवावा, असे आवाहन शहरातील दक्ष नागरिकांनी केले आहे.हाताची सफाईमनपा मुख्यालयाच्या प्रसाधनगृहामध्ये हात धुण्यासाठी डेटॉलचे हँडवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात बॉटल डेटॉलच्या असून आतमधील लिक्वीड सोप दुसºयाच कंपनीचा आहे. त्याचा दर्जाही चांगला नसल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले असून याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbaiनवी मुंबई