शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:51 IST

शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये आघाडी घेतली आहे. माझा कचरा माझी जबाबदारी, माझे शहर माझा अभिमान ही घोषवाक्ये घेवून शहरभर जनजागृती सुरू केली आहे. शहरात कुठेही कचºयाचे ढिगारे, डेब्रिज दिसले तर स्वच्छता अ‍ॅपवर फोटो पाठवा, चोवीस तासामध्ये कचरा साफ केला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखलही घेतली जात आहे. स्वच्छता अभियानासाठी अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारीही कर्मचाºयांना काम करावे लागत आहे. शहरभर अभियान प्रभावीपणे राबविणाºया प्रशासनाचे मुख्यालयातील कचºयाकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. कँटीनच्या बाहेरील बाजूला अनेक महिन्यांपासून डेब्रिजचा ढिगारा पडला आहे. पालिका अधिकारी व कर्मचारी रोज येथून ये - जा करत असूनही हा कचरा उचलण्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. व सर्व अधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन, बस डेपो, प्रत्येक विभागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत फिरत आहेत. परंतु अधिकाºयांना मुख्यालय परिसराचा दौरा करण्यास अधिकाºयांना वेळ नाही असे चित्र निर्माण झाले आहे. डेब्रिज कधी उचलले जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील मोठा भाग अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या माळ्यावर जमिनीवर लादीही टाकण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे चित्र आहे. विविध विभागांमध्ये कोपºयामध्ये कुठेही फाईलचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. मुख्यालयामध्ये साफसफाई चांगली होत असली तरी डेब्रिज व इतर कचरा कधी हटविला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेचे विभाग कार्यालय, रुग्णालय व शाळांच्या इमारतींमध्ये अनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पडले आहे. काही इमारतींच्या बाहेरील ठिकाणी भंगार गोडाऊनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे शहर स्वच्छतेला बाधा येऊ लागली आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रशासनाने स्वत:च्या इमारती व परिसर प्रथम स्वच्छ ठेवावा, असे आवाहन शहरातील दक्ष नागरिकांनी केले आहे.हाताची सफाईमनपा मुख्यालयाच्या प्रसाधनगृहामध्ये हात धुण्यासाठी डेटॉलचे हँडवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात बॉटल डेटॉलच्या असून आतमधील लिक्वीड सोप दुसºयाच कंपनीचा आहे. त्याचा दर्जाही चांगला नसल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले असून याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbaiनवी मुंबई