शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीच्या कार्यालयात टाकले डेब्रिज, माथाडींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:50 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले. कामे मार्गी लावली नाहीत, तर आंदोलन तीव्र करून मंत्र्यांच्या दालनात खडी टाकण्याचा इशारा दिला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाºया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विकासकामे ठप्प आहेत. पाच वर्षांपूर्वीच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली जात नाही. शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यावर उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे बाजारसमितीमधील अनेक कामे रखडली असून, त्यामध्ये दाणाबंदरमधील रोडच्या कामाचाही समावेश आहे. रोडचे काम अर्धवट राहिले आहे. ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला असून, त्याचा फटका वाहतूकदार, कामगार व ग्राहकांना होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन रखडलेले काम पूर्ण करत नाही. परिणामी, दिवसेंदिवस गैरसोयी वाढत आहेत. शासन व प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे माथाडीनेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मंगळवारी धान्य मार्केटमध्ये आंदोलन केले.संतप्त कामगारांनी रोडवरील खडी गोणीमध्ये भरून उपसचिवांच्या टेबलवर टाकली. कामगार, व्यापारी, ग्राहक, वाहतूकदार अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत; परंतु प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मार्केटमधील समस्यांची प्रशासनाला जाणीव व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. रखडलेली कामे पूर्ण केली नाहीत, तर ४ जानेवारीला एपीएमसीच्या मुख्य कार्यालयामध्ये खडी टाकली जाईल. यानंतरही कामे झाली नाहीत, तर पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनामध्ये रोडवरील खडी टाकण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी नरेंद्र पाटील यांच्यासह रविकांत पाटील, साहेबराव नांगरे, अशोक दुधाणे व इतर उपस्थित होते.धान्य मार्केटमधील रोडचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करण्यात आले. या विषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर एपीएमसी मुख्यालयात व नंतर पणनमंत्र्यांच्या दालनात खडी टाकून निषेध केला जाईल.- नरेंद्र पाटील, माथाडीनेतेकामावर होत आहे परिणामरोडच्या रखडलेल्या कामाचा मार्केटमधील व्यवहारावर परिणाम होऊ लागला आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. धुळीमुळे कामगार, व्यापारी व इतर घटकांना श्वसनाचे अजार होऊ लागले आहेत. वारंवार वाहतूककोंडी होत आहे. प्रचंड गैरसोय होत आहे. किती वर्ष हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मलनि:सारण वाहिन्याही खराब झाल्या आहेत. प्रसाधनगृहांमध्ये पाणी नाही व इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई