शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

एपीएमसीच्या कार्यालयात टाकले डेब्रिज, माथाडींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:50 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले. कामे मार्गी लावली नाहीत, तर आंदोलन तीव्र करून मंत्र्यांच्या दालनात खडी टाकण्याचा इशारा दिला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाºया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विकासकामे ठप्प आहेत. पाच वर्षांपूर्वीच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली जात नाही. शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यावर उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे बाजारसमितीमधील अनेक कामे रखडली असून, त्यामध्ये दाणाबंदरमधील रोडच्या कामाचाही समावेश आहे. रोडचे काम अर्धवट राहिले आहे. ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला असून, त्याचा फटका वाहतूकदार, कामगार व ग्राहकांना होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन रखडलेले काम पूर्ण करत नाही. परिणामी, दिवसेंदिवस गैरसोयी वाढत आहेत. शासन व प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे माथाडीनेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मंगळवारी धान्य मार्केटमध्ये आंदोलन केले.संतप्त कामगारांनी रोडवरील खडी गोणीमध्ये भरून उपसचिवांच्या टेबलवर टाकली. कामगार, व्यापारी, ग्राहक, वाहतूकदार अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत; परंतु प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मार्केटमधील समस्यांची प्रशासनाला जाणीव व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. रखडलेली कामे पूर्ण केली नाहीत, तर ४ जानेवारीला एपीएमसीच्या मुख्य कार्यालयामध्ये खडी टाकली जाईल. यानंतरही कामे झाली नाहीत, तर पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनामध्ये रोडवरील खडी टाकण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी नरेंद्र पाटील यांच्यासह रविकांत पाटील, साहेबराव नांगरे, अशोक दुधाणे व इतर उपस्थित होते.धान्य मार्केटमधील रोडचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करण्यात आले. या विषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर एपीएमसी मुख्यालयात व नंतर पणनमंत्र्यांच्या दालनात खडी टाकून निषेध केला जाईल.- नरेंद्र पाटील, माथाडीनेतेकामावर होत आहे परिणामरोडच्या रखडलेल्या कामाचा मार्केटमधील व्यवहारावर परिणाम होऊ लागला आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. धुळीमुळे कामगार, व्यापारी व इतर घटकांना श्वसनाचे अजार होऊ लागले आहेत. वारंवार वाहतूककोंडी होत आहे. प्रचंड गैरसोय होत आहे. किती वर्ष हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मलनि:सारण वाहिन्याही खराब झाल्या आहेत. प्रसाधनगृहांमध्ये पाणी नाही व इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई