शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घणसोलीच्या प्रवेशद्वारावर मृत्यूचा सापळा; अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 23:52 IST

ज्वलनशील द्रव्याचा साठा असलेल्या वाहनांचे पार्किंग

नवी मुंबई : घणसोलीच्या प्रवेशमार्गावरील रस्त्याचा एक भाग पूर्णपणे अवैध पार्किंगसाठी बळकावण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या त्या ठिकाणी पार्किंग सुरू करून त्याची रक्कम उकळली जात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्या ठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या टँकरचाही समावेश असल्याने घणसोलीच्या प्रवेशद्वारावरच मृत्यूचा सापळा तयार झाला आहे.

घणसोली सेक्टर ६ येथून घणसोलीत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे अवैध वाहनतळ म्हणून वापरली जात आहे. त्या ठिकाणी ज्वलनशील वायूसह इतर घातक द्रव्याचे टँकर उभे केले जात आहेत. त्यावर काम करणारे कामगारही परिसरातच उघड्यावर लघुशंका करत असल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडत आहे. याचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. तर अवैधरीत्या चालत असलेल्या पार्किंगसाठी पूर्ण रस्ता बळकावण्यात आल्याने इतर वाहनांच्या मार्गात त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. अशा वेळी एखाद्या भरधाव वाहनाची धडक तिथल्या उभ्या असलेल्या वाहनाला लागल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी रस्त्यावर अवैधरीत्या वाहने उभी करण्याचे काही व्यक्तींकडून शुल्कही उकळले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याकरिता काही कथित सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्तींचेही त्यांना पाठबळ मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांसह पालिका अधिकारीही दिवसातून अनेकदा या रस्त्याचा वापर करतात. मात्र, त्यांच्याकडूनही रस्त्यावरील अवैधरीत्या उभी केलेली वाहने हटवण्याचे धाडस दाखवले जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे; परंतु त्यांच्या दुर्लक्षामुळे घणसोलीत प्रवेशाच्या मार्गावर मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन एखाद्या समाजकंटकाकडून गैरकृत्य घडल्यास तिथली वाहने पेट घेऊ शकतात. अशा वेळी त्यामधील वायू अथवा द्रव्याची गळती झाल्यास संपूर्ण परिसराला धोका उद्भवू शकतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य प्रशासनाकडून घेतले जात नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.