शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू; नेरुळमधील रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 23:41 IST

खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

नवी मुंबई : खारघरमधील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असताना, नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे, रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. कदम यांची कोरोना तपासणी केली असता, पॉझिटिव्ह अहवाल आला होता. खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यावर नातेवाईकांनी उपचारासाठी नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची विनंती पनवेल महापालिकेकडे केली होती. त्यानुसार, शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी बेड उपलब्ध करून देण्यात आल्याने, कदम यांना डी.वाय.पाटील रुग्णालयात हलवले होते, परंतु रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने उपचार करण्यास विलंब झाला आणि कदम यांचे निधन झाल्याचा आरोप कदम यांचे जावई अतुल सपकाळ यांनी केला आहे.शनिवारी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नव्हता, परंतु पनवेल महापालिकेचे नोडल ऑफिसर मनोजकुमार शेट्टे यांनी रुग्णालयात एक बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आयसीयूमध्ये एक बेड उपलब्ध करून दिला होता. रुग्णाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाठविण्यास सांगितले होते, परंतु रुग्ण वेळेवर न आल्याने साडेसात वाजता अचानक आलेल्या दुसऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना तो बेड देण्यात आला. सदर रुग्ण साडेनऊ वाजता रुग्णालयात आला. त्यानंतरही आम्ही तत्काळ उपचार सुरू केले होते. एक तासात या रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर बेडही उपलब्ध करून दिला होता, परंतु दुर्दैवाने पहाटे त्यांचे निधन झाले. - राहुल पेड्डावाड, सीईओ डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय, नेरुळ

टॅग्स :doctorडॉक्टर