शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी पसरवतेय डेंग्यू, मलेरियाची साथ

By admin | Updated: July 17, 2017 01:34 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य काळजी घेतलेली नाही. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर ठेवलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत असून, यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने एपीएमसीला व येथील प्रशासनाने व्यापाऱ्यांसह ठेकेदारांना नोटीस पाठविण्यात सुरवात केली आहे. नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागल्याने महापालिका प्रशासनाने शहरभर जनजागृती सुरू केली आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस दिल्या जात आहेत. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर कारवाईचा इशाराही दिला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. फळ मार्केटमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या छतावर व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मार्केटमधून जप्त केलेल्या हातगाड्या याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. गटारांचे काम पूर्ण झाले नसल्याने सर्व पाणी एकाच ठिकाणी साचून रहात आहे. याशिवाय भाजी व फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर मोकळे क्रेट्स ठेवले आहेत. गाळ्यांवर अनधिकृतपणे पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्या टाक्यांची साफसफाई केली जात नाही. पाणी साचून रहात असल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. याशिवाय मार्केटमध्ये कँटीन व इतर खाद्यपदार्थ विक्रेते त्यांच्याकडील शिल्लक खाद्यपदार्थ गटारामध्ये टाकत असून सर्व गटारांमध्ये गाळ साचला आहे. जागोजागी पाणी साचत असल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. भाजी मार्केटला लागून व कृषी प्लाझाच्या मागील बाजूलाही एपीएमसीने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पालिकेच्या जलउदंचन केंद्राच्या बाजूला मोठा खड्डा तयार केला आहे. या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याशिवाय बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. विस्तारित भाजी मार्केट व फळ मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे परप्रांतीय कामगार वास्तव्य करत आहेत. या कामगारांमुळेही मार्केटमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत असून साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने नोटीस पाठविल्यानंतर बाजार समिती प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी व ठेकेदारांना बाजार समिती प्रशासन स्वत: नोटीस बजावत आहे. मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला असून दोन दिवसांपासून नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.