शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:05 IST

पनवेलमधील प्रकार : अपघाताचा धोका; संबंधित प्राधिकरणाने सूचना फलक लावून हात झटकले

वैभव गायकरपनवेल : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम-पुनर्वसन, रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आदी कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही शहरात काही धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक ब्रिटिशकालीन पूल रातोरात कोसळल्याने संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. दोन वर्षांत शेकडो पुलांचे आॅडिट करण्यात आले, तर काही पूल नव्याने उभारण्यात आले. मात्र, आजही पनवेल तालुक्यातील काही धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. पनवेलमध्ये महापालिका, सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणे कार्यरत आहेत. शहरातील काही पूल धोकादायक आहेत. मात्र, या पुलाजवळ धोकादायक असल्याचे फलक लावून संबंधित यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बिनदिक्कत पुलावरून वाहतूक सुरू आहे. खारघर, तळोजा, पनवेल आदी ठिकाणी हे धोकादायक पूल आहेत. खारघरमधून सायन-पनवेल महामार्ग गाठण्यासाठी कोपरा पुलावरून जावे लागते.अनेक वर्षांपासून सिडकोने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. या पुलाला पर्याय म्हणून समांतर नवीन पूल उभारण्यात आला आहे. तसेच जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे फलकही याठिकाणी लावले आहे. मात्र, तरी देखील या ठिकाणाहून सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते.कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील नावडे गावाजवळ कासाडी नदीवर ब्रिटिशांनी उभारलेला पूल जीर्णावस्थेत आहे, तरीही पुलावरून अद्याप वाहनांची ये-जा सुरू आहे. एमएसआरडीसीअंतर्गत असलेल्या या पुलाला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अशाच प्रकारे कोळीवाडा येथील पूल धोकादायक असल्याचे सांगत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही पुलावरून वाहतूक होताना दिसते. धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. मात्र, तसे न होता केवळ सूचना फलक लावून संबंधित प्राधिकरणमोकळे झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते.दोन वर्षांनंतर धोकादायक पूल वाहतुकीस बंदखारघर शहर ते तळोजा गावाला जोडणारा पूल दोन वर्षांपूर्वी सिडकोने धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरी पुलावरून वाहतूक सुरूच होती. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला.पनवेलमधील ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत दोन गावांना जोडणारे अनेक लहान पूल उभारण्यात आले आहेत. यापैकी काही पूल धोकादायक असून त्यांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी