शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
4
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
5
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
6
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
7
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
8
मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
9
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
10
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
11
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
12
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
13
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
14
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
15
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
16
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
17
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
18
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
19
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
20
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड

धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:05 IST

पनवेलमधील प्रकार : अपघाताचा धोका; संबंधित प्राधिकरणाने सूचना फलक लावून हात झटकले

वैभव गायकरपनवेल : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम-पुनर्वसन, रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आदी कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही शहरात काही धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक ब्रिटिशकालीन पूल रातोरात कोसळल्याने संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. दोन वर्षांत शेकडो पुलांचे आॅडिट करण्यात आले, तर काही पूल नव्याने उभारण्यात आले. मात्र, आजही पनवेल तालुक्यातील काही धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. पनवेलमध्ये महापालिका, सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणे कार्यरत आहेत. शहरातील काही पूल धोकादायक आहेत. मात्र, या पुलाजवळ धोकादायक असल्याचे फलक लावून संबंधित यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बिनदिक्कत पुलावरून वाहतूक सुरू आहे. खारघर, तळोजा, पनवेल आदी ठिकाणी हे धोकादायक पूल आहेत. खारघरमधून सायन-पनवेल महामार्ग गाठण्यासाठी कोपरा पुलावरून जावे लागते.अनेक वर्षांपासून सिडकोने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. या पुलाला पर्याय म्हणून समांतर नवीन पूल उभारण्यात आला आहे. तसेच जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे फलकही याठिकाणी लावले आहे. मात्र, तरी देखील या ठिकाणाहून सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते.कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील नावडे गावाजवळ कासाडी नदीवर ब्रिटिशांनी उभारलेला पूल जीर्णावस्थेत आहे, तरीही पुलावरून अद्याप वाहनांची ये-जा सुरू आहे. एमएसआरडीसीअंतर्गत असलेल्या या पुलाला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अशाच प्रकारे कोळीवाडा येथील पूल धोकादायक असल्याचे सांगत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही पुलावरून वाहतूक होताना दिसते. धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. मात्र, तसे न होता केवळ सूचना फलक लावून संबंधित प्राधिकरणमोकळे झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते.दोन वर्षांनंतर धोकादायक पूल वाहतुकीस बंदखारघर शहर ते तळोजा गावाला जोडणारा पूल दोन वर्षांपूर्वी सिडकोने धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरी पुलावरून वाहतूक सुरूच होती. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला.पनवेलमधील ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत दोन गावांना जोडणारे अनेक लहान पूल उभारण्यात आले आहेत. यापैकी काही पूल धोकादायक असून त्यांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी