शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

महामार्गावर अपघातांचा धोका; पावसामुळे उड्डाणपुलावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 05:32 IST

पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत.

नवी मुंबई : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडत असल्याने तिथल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यापैकी काही खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. यानुसार शिरवणे पुलालगत भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र रविवारी दिसत होते. मात्र उरण फाटा येथील पुलावर देखील सीबीडीकडे जाणाऱ्या लेनवर खड्डे पडले आहेत. गतवर्षी देखील या पुलावर खड्डे पडले होते, तर शिरवणे येथील संपूर्ण पुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांपासून संपूर्ण ठाणे-बेलापूर मार्गाच्या दुरुस्ती कामांतर्गत सातत्याने खड्डे पडणाºया ठिकाणांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही अवघ्या चार दिवसांच्या पावसामुळे या दुरुस्तीकामांच्या दर्जाचा भांडाफोड झाला आहे. या खड्ड्यांच्या ठिकाणी वाहनांची गती मंदावत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. तर रात्रीच्या वेळी हे खड्डे दुचाकीस्वारांच्या नजरेस न पडल्यास अपघात घडून जीवितहानी होवू शकते. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात अशाच खड्ड्यांमुळे घडलेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड देखील केली होती. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरवातीलाच सायन- पनवेल मार्गावर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटनांमधून घडणारी मृत्यूची मालिका यंदाही सुरूच राहणार का ? असा संतात प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई