शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दादोजी कोंडदेवांचा ‘तो’ पुतळा पुन्हा लावावा

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे.

अनिकेत घमंडी- डोंबिवली 
आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन  टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे. आमच्या पिढीर्पयत त्यांचे महान कार्य पोहचल़े परंतु, ते पुढच्या पिढीर्पयत जसेच्या तसे जावे हा उद्देश. याच उद्देशाने संगितावाडीतील आशापुरी इमारतीसह परिसरातील काही युवक दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. 
दरवर्षी किल्ला बनवतांना सामाजिक संदेश देऊन समस्त डोंबिवलीकरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येतात. त्यासाठीच यंदा ‘गडांचा राजा किल्ले राजगड’ची प्रतिकृती बनविण्यात आली असून पुण्यातील ‘ दादोजी कोंडदेव’ यांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी डोंबिवलीकर इतिहासप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे.
गड किल्ले संवंर्धनासोबतच इतिहास चिरंतन टिकवण्यासाठी या युवकांनी धडपड मोहीम राबवली आहे. त्याचनिमित्ताने जेथे दादोजीं कोंडदेवांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्यात यावा ही मागणी करण्यासाठी स्वाक्ष:या गोळा करण्याचे धाडस त्यांनी केले असून दिवाळी निमित्ताने त्या मुख्य उद्देशासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आल्याचे या संकल्पनेचा म्होरक्या व्यवसायाने विद्युत अभियंता अमेय काटदरे याने सांगितले. त्याच्यासोबत कुशल देवळेकर (आय टी), रोहीत गोवेकर (केमी. इंजी.), मंगेश पारधी, मंगेश काटदरे, गोविंद मांजरेकर, प्रथमेश पंडीत, आदीश भगत, अमित देशमुख, आशीष दळवी, कल्पेश शहा, पौर्णिमा टमके, आदिती भगत , गौरी गोवेकर आदींसह अबालवृद्ध या उपक्रमात सहभागी आहेत.
गेल्या वर्षी तोरणा गड केला होता, त्याच दरम्यान या मंडळींनी राजगड स्वारी केली होती. त्यामुळे त्याची प्रतिकृती करण्याचा चंग त्यांनी बांधला होता़  पुढील वर्षासाठीही सिंहगड, विशाल गड, तुंग गड आदींसह अन्य गडकिल्लयांची माहिती गोळा करून त्या ठिकाणापैकी एका ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रय} असल्याचे तो सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण स्वराज्य बघू शकतो, अनुभवू शकतो. मुघल साम्राज्याचा नायनाट करून दिल्लीचे तख्त फोडण्याचा प्रचंड असा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. अध्यात्म, गुरुवंदन, मातृभक्ती, संस्कार, परंपरा, संस्कृती, पर स्त्री माते समान, फितुरीला दंड, गद्दाराला शासन यासह सुशासन यांसह सुयोग्य नियोजन आदीचे अनेक दाखले महाराजांचा अभ्यास केल्यास मिळतात. त्यांचा वारसा नेमका आपण जपतो आहोत का? त्यातील एक तरी गोष्ट आपण करतो आहोत का? त्यांच्याकाळी संदेश वहनाच्या कोणत्याची अद्ययावत सुविधा नसतांना, दळणवळणाची साधने नसतांनाही केवळ ‘विश्वास’ या एकमेव धाग्यावर त्यांनी शेकडो युद्धे केली-जिंकली. 
अनेक गड किल्ले काबीज केले. हे सध्याच्या राजकारण्यांना जमते आहे का? तर ते अस्तित्वात आणण्यासाठी सचोटी, पारदर्शक व्यवहार आणि दुस-याचा सन्मान, एकात्म निष्ठा आदी महत्वाची असत़े सध्या मात्र तसे दिसत नाही, आणि ठिकठिकाणी ‘जाणता राजा’च्या पाटय़ा मात्र झळकतांना दिसतात. त्या सर्वानी अंतमरुख होऊन विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रचंड उद्वेगाने त्या युवकांनी सांगितले. या सा-याची खंत असून खारीचा वाटा उचलण्यासाठीच या उपक्रमातून जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे अमेय सांगतो.
 
राजगडावर काय बघाल : पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बाले किल्ला, पद्मावती तलाव, रामेश्वराचे मंदिर, पाली दरवाजा, सुळे दरवाजा, गुंजवणो, महादरवाजा, सई बाईंची समाधी, राजवाडा, दारु कोठार आदीची माहिती देण्यात आली आहे.
 
राजगडावरच्या महत्वाच्या घटना -  
1647 - छ. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, 
1649 - गडाची डागडुजी, 
11 जुलै 1659 - अफझलखानाला भेटण्यासाठी महाराज प्रतापगडावर, 
5 सप्टें. 1659- सईबाईचा गडावर मृत्यू, 
जुलै 166क् - पन्हाळगडावरुन महाराज राजगडावर, 
1661 - भवानी माता माँ साहेबांना दाखवण्यासाठी गडावर, 1664 - सुरतेची लुट गडावर आणण्यात आली, 
1665 - मुघलांचा गडावर अयशस्वी हल्ला, 
24 फेब्रु.167क् - राजाराम महाराजांचा जन्म, 
1689 - संभाजींच्या वधानंतर मुघलांनी गड जिंकला, 
1818 - गड इंग्रजांच्या ताब्यात.