- नामदेव मोरे नवी मुंबई : देशभर डाळींसह कडधान्याचे बाजारभाव गडगडले असून गेल्यावर्षी घाऊक बाजारपेठेत १०० ते १२५ रुपये किलो दराने विकल्या जाणाºया डाळींचे दर यंदा ६० ते ७० रुपयांवर आले आहेत. देशभर पाच वर्षांपासून डाळी व कडधान्यांना चांगले बाजारभाव मिळू लागले होते. टंचाई दूर करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. वाढलेले बाजारभाव लक्षात घेऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमधील शेतकºयांनी कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले. परंतु शासनाने आयात व निर्यातीविषयी योग्य निर्णय घेतले नसल्याने सध्या डाळींसह कडधान्याचे भाव गडगडले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गतवर्षी चणाडाळ ११० ते १२५ रुपये किलो दराने विकली जात होती. तूर डाळ ८० ते ११५ व मूग डाळ ७० ते १०० रुपये किलो दराने विकली जात होती. परंतु तीन महिन्यांपासून या दरामध्ये सातत्याने घसरण होऊ लागली आहे. सध्या हे दर किमान ५० ते कमाल ८५ रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारात हेच दर ७० ते ८५ रुपये किलो इतके आहेत.डाळी व कडधान्यांचे दर एक वर्षात जवळपास निम्म्याने कमी झाले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून डाळींची आयात थांबवून निर्यातीला प्रोत्साहन दिले तरच परिस्थिती बदलेल, असे ग्रेन, राईस अँड आॅईल सीड्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.घाऊक बाजारातील डाळींचे दर पुढीलप्रमाणेवस्तू आॅक्टोबर २०१६ जुलै २०१७चणाडाळ ११० ते १२५ ६० ते ७०तूरडाळ ८० ते ११५ ४५ ते ५५मूगडाळ ७० ते १०० ५० ते ५५मसूरडाळ ६० ते ७० ४० ते ४५सध्या किरकोळ बाजारातील दरतूरडाळ-८० ते ८५ रुपये, मसूरडाळ-७० ते ७५ रुपये, मूगडाळ-७५ ते ८५ रुपये, चणाडाळ- ८५ ते ९५ रुपये.
डाळी-कडधान्याचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:58 IST