शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भंगार रिक्षाटेम्पोतून सिलिंडर वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 23:39 IST

अपघाताचा धोका : आरटीओसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबई : तुर्भे परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या डिलेव्हरीसाठी भंगार अवस्थेतील रिक्षाटेम्पोचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून दररोज ही वाहने जात असतानाही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. परिणामी, एखादा अपघात झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या डिलेव्हरीसाठी सुस्थितीतील वाहनांचा वापर होणे आवश्यक आहे. शिवाय अशा वाहनांची आरटीओकडून वेळोवेळी तपासणीही होणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिक उद्देशासाठी वापरल्या जात असलेल्या वाहनांच्या बाबतीत आरटीओसह वाहतूक पोलिसांकडून फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त होत असतो. अशातच तुर्भे, सानपाडा परिसरात गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे भंगार अवस्थेत असलेल्या रिक्षाटेम्पोचा वापर होताना दिसत आहे. त्याचे निम्याहून अधिक भाग निखळलेले असून ते रस्सीने बांधण्यात आलेले आहेत. त्याशिवाय चालकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचाही त्यावर अभाव दिसून येत आहे.

सानपाडा येथील गॅस एजन्सीकडून या टेम्पोचा वापर होत असून, तुर्भेसह लगतच्या परिसरातील गॅसग्राहकांपर्यंत त्यामधून सिलिंडर पोहोचवले जात आहेत. यानुसार सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा जंक्शन येथून हा टेम्पो नियमित ये-जा करत असतो. त्याच ठिकाणी सातत्याने वाहतूक पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून या रिक्षाटेम्पोवर कारवाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाया फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? असा प्रश्न तुर्भेतील ग्रामस्थ शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे; रस्त्यावरील शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालून धोकादायक स्थितीमध्ये जीर्ण अवस्थेतील टेम्पोतून गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची मागणी शरद पाटील यांनी केली आहे.