शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

ग्राहकांना वर्षभर खरेदीची मुभा

By admin | Updated: March 24, 2015 00:49 IST

वर्षातील ३६५ दिवस राज्यातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची मात्र पुरती दमछाक उडणार आहे.

चेतन ननावरे ल्ल मुंबई वर्षातील ३६५ दिवस राज्यातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची मात्र पुरती दमछाक उडणार आहे. मालकांसाठी ही आनंदवार्ता असली, तरी कामगारांचे मात्र यामुळे शोषण होण्याची भीती व्यक्त होत आहे.आजघडीला मुंबईत ३ लाखांहून अधिक दुकाने आहेत. तर कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स, हॉटेल व चित्रपटगृहांची संख्या मिळवल्यास हा आकडा साडेसहा लाखांच्या घरात जातो. त्यांत एकूण २३ लाखांहून अधिक कामगार काम करतात. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या दुकाने व आस्थापनांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडे केवळ २५० कर्मचारी-अधिकारीही नाहीत. त्यामुळे आठवड्याचे सर्वच दिवस दुकाने सुरू ठेवताना कायद्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार का? असा पहिला प्रश्न उपस्थित होतो.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान दुकान व आस्थापना विभागाचे अनेक कर्मचारी निवडणुक कामांत व्यस्त होते. तरीही विभागाच्या भरारी पथक आणि निरीक्षकांनी २ लाख ४३ हजार ९७० दुकानांची तपासणी केली. त्यात २२ हजार ६४१ प्रकरणांत दुकाने व आस्थापना कायद्याचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांतील २२ हजार ६१७ प्रकरणांत निरीक्षकांनी कारवाई करण्याची शिफारस केली. मात्र निवडणुक कामांमुळे केवळ ६८६ प्रकरणांत कारवाई करणे शक्य झाले. त्यामुळे दुकानदार कायद्याचे कितपत पालन करतात आणि त्यांवर प्रशासनातर्फे होणारी कारवाई किती ढोबळ आहे, हे निदर्शनास येते.कामगार कायद्याच्या बाबतही तीच परिस्थिती समोर येते. प्रशानसाने गेल्या वर्षी ३९ हजार ८११ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली. त्यात २६४ प्रकरणांत किमान वेतन कायद्याचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी अधिक चौकशी केल्यानंतर २०० मालकांवर कारवाई करण्याची शिफारस निरीक्षकांनी केली होती. मात्र अपूऱ्या कर्मचारी वर्गामुळे केवळ १० मालकांवर कारवाई झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.च्दुकाने व आस्थापना विभागासाठी प्रशासनाने २६३ पदे मंजूर केली आहेत. मात्र त्यातील २४१ पदांवर कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून २२ पदे आजही रिक्त आहेत. याशिवाय ३६५ दिवस दुकाने खुली ठेवायची असतील, तर रिक्त पदे भरून आणखी १० टक्के पदांची निर्मिती करावी लागेल, असे मत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.च्वर्षभर दुकाने सुरू राहणार असली, तरीही प्रत्येक दुकानदाराला दुकानात काम करणाऱ्या कामगाराला आठवड्याची रजा द्यावी लागणार असल्याचे मत दुकान व आस्थापना विभागाचे प्रमुख निरीक्षक अ. द. गोसावी यांनी व्यक्त केले आहे. गोसावी यांनी सांगितले की, कामगाराला सुट्टी कधी देणार याची पाटी आधीच दुकानात लावणे बंधनकारक असेल. अन्यथा दुकाने व आस्थापना विभाग दुकानदारावर कायदेशीर कारवाई करेल. ३६५ दिवस दुकाने खुली राहणार असल्याने आधी आठवड्यातील ६ दिवस काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातही दिवस कार्यरत राहावे लागणार आहे. शिवाय नव्या नियमांमुळे कामगारांचे शोषण होऊ देणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.मुंबईत एकूण ६ लाख ५१ हजार ३६ दुकाने आणि आस्थापना असून त्यांत २३ लाख ३७ हजार ९३९ कामगार काम करतात.च्दुकाने - ३ लाख २ हजार ३३५कामगार - ३ लाख ५६ हजार ६१९च्कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स - ३ लाख ३३ हजार १४२कामगार - १८ लाख ४८ हजार ९२८च्हॉटेल - १४ हजार ७०१कामगार - १ लाख २६ हजार ९०६च्चित्रपटगृहे - ८५८,कामगार - ५ हजार ४८६च्‘अच्छे दिन’ आल्याचे म्हणत रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयाने दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला असून खऱ्या अर्थाने मॉल आणि इतर स्पर्धकांचा ते सामना करू शकतील, अशी प्रतिक्रिया संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ग्राहकांनीही वर्षभर खरेदी करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.