शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

खरेदीसाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

By admin | Updated: September 14, 2015 03:50 IST

गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य

वसई/विरार/पालघर : गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य ते सजावटीच्या सामग्रीपर्यंत खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. दुकानात आणि बाजारपेठेच्या रस्त्यांवर वावरण्यासही जागा नव्हती. अनेक दुकानांत ग्राहकांना शिरण्यासाठीदेखील प्रतीक्षा करावी लागत होती.रविवारी बाजारपेठेत अशी गर्दी होणार, याचा अंदाज दुकानदारांनाही होता. त्यामुळे त्यांनीही तशी पूर्वतयारी केली होती. बाजारपेठेतील या गर्दीमुळे ग्राहकांना कुठेही पार्किंगसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांनी खूप लांबवर आपली वाहने पार्क करून पायीच खरेदी करणे पसंत केले. सगळ्यांना पावसाची भीती होती. परंतु, तुरळक सरीवगळता पावसानेही आज फारशी हजेरी न लावल्याने बाजारपेठेत मोठा उत्साह होता. मखरांचा बाजार प्रचंड तेजीत होता. थर्माकोल, कृत्रिम फुले, फोल्डिंगची मखरे आज तडाखेबंदी विकली गेलीत. तर, सजावटीसाठी लागणाऱ्या विजेच्या माळा आणि अन्य सामग्री यांच्याही बाजारपेठा भरपूर तेजीत होत्या. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणाला रिक्षांच्या टंचाईने गालबोट लागत होते. अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नव्हती. त्यातच आज भाविक खरेदीला सहकुटुंब बाहेर पडल्याने गर्दीत प्रचंड भर पडली होती. सगळ्यांचा हातात खरेदीच्या पिशव्या, वरती आभाळ भरून आलेले आणि रिक्षा मिळत नाही, अशा स्थितीत अनेकांची रखडपट्टी झाली.रविवार असल्याने शहर बस वाहतुकीची सेवाही मंदावलेली होती. गणरायांच्या मूर्तीची आणि पूजा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानांचाही आज भरपूर सेल झाला. मूर्ती नोंदविण्यासाठी भक्तांनी आज दाटी केल्याने विक्रेत्यांना फुरसतही नव्हती. किराणा मालाची दुकाने तसेच अन्य सामग्रीची दुकाने यांच्यासाठीही आजचा दिवस तेजीचा ठरला. सकाळी काही काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे आजच्या खरेदीच्या उत्सहावर पाणी पडते की काय, ही धास्ती सगळ्यांना होती. परंतु, गणरायाने सद्बुद्धी दिल्याने वरूणराजाने अल्पावधीतच काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती.