शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 7, 2022 18:28 IST

दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हप्ता न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी त्यांनी दिली होती. यापूर्वीपण ते दोघे येऊन हप्त्याची मागणी करून गेले होते. 

दिघा येथील ईश्वरनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी रामआचल सिंग यांचा छोटा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अज्ञात दोघे आले होते. त्यांनी हप्ता स्वरूपात १० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र सिंग यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. ३ नोव्हेंबरला ते दोघे पुन्हा आले असता त्यांनी ३ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. मात्र सिंग यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी परिसरात सर्वजण आपल्याला हप्ता देतात असे सांगत त्यांनाही तो देण्याचा इशारा दिला. अन्यथा दुकान जाळण्याची धमकी देऊन तिथून निघून गेले. 

यामुळे सिंग यांनी त्या दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेवरून दिघा परिसरात व्यावसायिकांकडून गुन्हेगार व्यक्ती हप्ता उकळला असल्याचा प्रकार समोर येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई