शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा; मृत तरुणाच्या आईची मागणी

By पंकज पाटील | Updated: June 7, 2023 18:28 IST

अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली.

अंबरनाथ : अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. या तरुणाच्या आईने पोलीस प्रशासनाकडे अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिसरातील सर्वच तरुण आमली पदार्थाच्या आहारी जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाने आता तरी अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे. 

सोमवारी अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरामध्ये अरमान या व्यसनाधीन तरुणाला अमली पदार्थ न मिळाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर आता भगतसिंग नगर परिसरातील महिलांनी अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. आरमान याचा व्यसनामुळे मृत्यू झाला असला तरी या व्यसनेच्या आहारी याच परिसरातील अनेक तरुण गेले असून ते देखील अशाच पद्धतीने आपला जीव गमावणार आहे, या भीतीने आता परिसरातील महिलांनी एकत्रित येत पोलीस प्रशासनाकडे अमली पदार्थ विकणाऱ्यांची तक्रार केली आहे. उघडपणे भगतसिंग नगर परिसरात आमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. 

दुसरीकडे या परिसरात आमला पदार्थांची विक्री होत असल्याची बाब पोलिसांच्या ही निदर्शनास आलेले असतानाही संबंधित आरोपींवर अद्यापही कारवाई झालेली नाही. या परिसरातील गावगुंड आणि तडीपार गुंड देखील याच अमली पदार्थांची विक्री करून परिसरात दहशत निर्माण करीत आहे. या परिसरात सहा ते सात घरांमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री केली जाते. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची सर्व हिस्ट्री पोलीस प्रशासनाकडे असताना देखील त्या आरोपींकडे उघडपणे दुर्लक्ष करीत आहे. भगतसिंग नगर परिसरामध्ये सोलुशन, गांजा,चरस, आणि बटन नावाच्या अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या अमली पदार्थांची विक्रीवर कुठेतरी रोख लावण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना विचारले असता या परिसरात पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते मात्र त्या कारवाईदरम्यान कोणतेही अमली पदार्थ हाती लागत नसल्याची खंत व्यक्त केली.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी