शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आवरे पोर्ट गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 02:34 IST

रायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे. ठरावीक मुदतीमध्ये प्रकल्प न उभारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती खारेपाट विभाग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे तालुक्यातील सुमारे बाराशे एकर जमीन रिलायन्सच्या तावडीतून पुन्हा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पाच वर्षांत जमिनीवर प्रकल्प उभा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याबाबत मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत कार्यालयाला अवगत करावे, असे पत्र कोकण विभागाचे उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी ३० मार्च २०१६ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. २०१२मध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा होता मात्र २०१६ उजाडले तरी, प्रकल्प सुरूही झाला नाही. त्यामुळे कायद्याचा आधार घेत आम्ही आमच्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. २००५-०६ या कालावधीत जिल्ह्यामध्ये सुमारे २६ सेझ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने एकट्या अलिबाग तालुक्यात सेझ प्रकल्पांची संख्या सर्वाधिक होती. याच कालावधीमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवस-आवरे येथे रिलायन्सच्या खासगी पोर्टला परवानगी देण्यात आली होती. २००२मध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे करारपत्र केले होेते. विजय पापाराव यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना हा प्रकल्प विकला होता. पोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या अन्य जमिनीसाठी रिलायन्सने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यास २००६मध्येच सुरुवात केली होती. बहिरीचा पाडा, सोनकोठा, रामकोठा, माणकुळे, हाशिवरे, कावाडे, बेलपाडा, डावली, रांजणखार, मिळकतखार आणि नारंगी या गावातील सुमारे ३५० शेतकऱ्यांची सुमारे १२०० एकर जमीन खरेदीसाठी कंपनीने एकरी साडेपाच लाख रुपये मोजले होते.