शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

आवरे पोर्ट गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 02:34 IST

रायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे. ठरावीक मुदतीमध्ये प्रकल्प न उभारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती खारेपाट विभाग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे तालुक्यातील सुमारे बाराशे एकर जमीन रिलायन्सच्या तावडीतून पुन्हा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पाच वर्षांत जमिनीवर प्रकल्प उभा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याबाबत मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत कार्यालयाला अवगत करावे, असे पत्र कोकण विभागाचे उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी ३० मार्च २०१६ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. २०१२मध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा होता मात्र २०१६ उजाडले तरी, प्रकल्प सुरूही झाला नाही. त्यामुळे कायद्याचा आधार घेत आम्ही आमच्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. २००५-०६ या कालावधीत जिल्ह्यामध्ये सुमारे २६ सेझ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने एकट्या अलिबाग तालुक्यात सेझ प्रकल्पांची संख्या सर्वाधिक होती. याच कालावधीमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवस-आवरे येथे रिलायन्सच्या खासगी पोर्टला परवानगी देण्यात आली होती. २००२मध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे करारपत्र केले होेते. विजय पापाराव यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना हा प्रकल्प विकला होता. पोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या अन्य जमिनीसाठी रिलायन्सने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यास २००६मध्येच सुरुवात केली होती. बहिरीचा पाडा, सोनकोठा, रामकोठा, माणकुळे, हाशिवरे, कावाडे, बेलपाडा, डावली, रांजणखार, मिळकतखार आणि नारंगी या गावातील सुमारे ३५० शेतकऱ्यांची सुमारे १२०० एकर जमीन खरेदीसाठी कंपनीने एकरी साडेपाच लाख रुपये मोजले होते.