शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

शहर विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत भ्रष्टाचार, आरिफ नसीम खान यांची टीका

By योगेश पिंगळे | Updated: October 14, 2023 17:31 IST

काँग्रेसच्या सभेत गणेश नाईक लक्ष्य

नवी मुंबई : देशात आणि राज्यात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासारखे प्रमुख प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांची सहनशीलता संपलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांचे काम एकसारखे असल्याने देश आणि राज्यातील नागरिकांना आता परिवर्तन हवे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी सांगितले. नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते.

नवी मुंबईच्या नेत्यांनी शहराच्या विकासाखाली भ्रष्टाचार करून स्वतःचा विकास केल्याचा आरोप त्यांनी यावेळी नाव न घेता आमदार गणेश नाईक यांच्यावर केला. नवी मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या पोकळ आश्वासनांचा, गैरकृत्यांचा जनतेला वीट आला असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि केंद्रात पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येऊन एक चांगले सरकार देशाला मिळेल, असा आशावादही खान यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी १९९९ पासून २०१४ या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्यामुळे नवी मुंबई शहराचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे ते म्हणाले. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांकडे नवी मुंबईकरांचे प्रश्न माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने मांडून ते सोडविल्याचे आपण पाहिले असल्याचे यावेळी कदम म्हणाले.

कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य बचुभाई धरमशी आरेठीया, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मंदाकिनी म्हात्रे, अविनाश लाड, प्रभारी एहसास अहमद खान, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐरोलीतून अनिकेत म्हात्रे काँग्रेसचे उमेदवारकाहीतरी कर नवी मुंबई कर या अनिकेतच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी युवकची टीम उभी आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांना विधानसभेला काँग्रेसच्या माध्यमातून तिकीट देण्यात येईल. त्यांना पाहिजे ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रत्येक कामात ५ टक्के घेतले

नवी मुंबईतील एका नेत्याच्या मुलाला महापौर करण्यासाठी आम्ही मदत केली त्यानंतर त्यांनी आम्हाला उपमहापौर करण्यासाठी मदत केली त्यामुळे कोणाचेही कोणावर उपकार नसून आमचा बाप काढणे, या नेत्याला शोभत नसल्याची टीका माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी केली. या नेत्याने आजवर काम न करता फक्त श्रेय आणि प्रत्येक कामात ५ टक्के घेण्याचे काम केल्याचा आरोप म्हात्रे यांनी नाव न घेता आमदार गणेश नाईक यांच्यावर केला.

अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग कायनवी मुंबई शहराला समस्यांनी ग्रासले असून नवी मुंबई हे खरोखर सुनियोजित शहर आहे का असा प्रश्न पडल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी केली. तिच तिच लोकं सत्तेवर असून सामान्य प्रश्न सुटत नसतील तर अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग काय ? असा टोलादेखील त्यांनी आमदार नाईक यांना लगावला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई