शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

CoronaVirus : पोलिसांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; वयस्कर व आजारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्त नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 20:55 IST

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो.

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मागील दीड महिना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय त्यांच्याही कुटुंबीयांना अन्न धान्याची चणचण भासणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान ५० वर्षे वयाच्या व प्रकृती ठिक नसलेल्यांना देखील तणावापासून लांब ठेवले जात आहे. 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो. अशावेळी त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ठिक राहावे, यासाठी पोलीस आयुक्तालय मार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घरची चिंता लागू नये याकरिता ४ हजार कर्मचाऱ्यांना अन्न धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय बंदोबस्ताचा ठिकाणी सावलीसाठी शेड व सॅनिटायझर पुरविले आहेत. सध्या आयुक्तालय क्षेत्रात ९ चेकपोस्ट लावण्यात आल्या असून त्या सर्व ठिकाणी मंडप घातले आहेत. त्याठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अन्न पाण्याचीही सोय केली आहे.

पोलीस संजय कुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्यासह सर्व उपायुक्तांकडून कोरोनापासून पोलिसांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. बॅचरल राहणाऱ्या ४५० कर्मचाऱ्यांची दोन वेळच जेवण दिले जात आहे.  तर वयाने ५० वर्षापेक्षा जास्त असलेल्यांना व प्रकृतीची कारणे असलेल्यांना तणावाच्या ठिकाणच्या बंदोबस्तामधून वगळण्यात आले आहे. शिवाय कर्तव्य बजावत असताना सुरक्षेसाठी ६२६४ हॅन्डग्लोज, २५०० हेडशिल्ड व ६०० गॉगल पुरवण्यात आलेत. प्रत्येक पोलिसठाण्यात पाच पीपीई किट देण्यात आले आहेत. शिवाय ४९०० अधिकारी व कर्मचारी यांना एन ९५ मास्कचे व कुटुंबियांना तीन लेयरच्या सुमारे ३८ हजार मास्कचे वाटप केले आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने सर्वांची वैद्यकीय चाचणी केली असता डॉक्टरांनी ७४ जनाची कोरोना चाचणी करण्याचे सुचवले होते. त्यापैकी ३२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४२ जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान पोलिसांचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधें देण्यात आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई