शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना रुग्णांचा ५० हजारांचा टप्पा पार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:14 IST

Navi Mumbai : रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या सक्षम उपाययोजनांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. असे असले तरी शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ८२ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून शहरात आतापर्यंत एकूण ५०,२९१ रुग्ण सापडले आहेत. असे असले तरी त्यापैकी ४८,२५७ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मार्चनंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत गेल्याने रुग्णांची एकूण संख्या ५०,२९१ इतकी झाली आहे. तर १०३३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचारपध्दतीचा अवलंब केला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. त्यामुळे मृत्यूंचा आकडा दिवसाला २ ते ३ वर येऊन ठेपला आहे. पूर्वी हाच आकडा प्रतिदिनी ५ ते ६ इतका होता. मृत्युदर कमी करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. त्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन आकड्यात घट झाली. महापालिकेने आतापर्यंत.४,१३,५९४ इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत.

यात आरटीपीसीआर १,५८,५२३ आणि २,५५,०७१ अ‍ँटिजेन टेस्टचा समावेश आहे. अनलॉकअंतर्गत महापालिकेने शहरातील बहुतांश व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची अनुमती दिली आहे. मात्र मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात धुणे व शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यालासुध्दा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. सध्या १,००१ रुग्ण महापालिकेच्या विविध केंद्रांत उपचार घेत आहेत.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु त्यादृष्टीने महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. 

महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यशमहापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. असे असले तरी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस