शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
4
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
5
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
6
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
7
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
10
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
11
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
12
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
13
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
14
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
15
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
16
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
17
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
18
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
19
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
20
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना रुग्णांचा ५० हजारांचा टप्पा पार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:14 IST

Navi Mumbai : रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या सक्षम उपाययोजनांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. असे असले तरी शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ८२ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून शहरात आतापर्यंत एकूण ५०,२९१ रुग्ण सापडले आहेत. असे असले तरी त्यापैकी ४८,२५७ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मार्चनंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत गेल्याने रुग्णांची एकूण संख्या ५०,२९१ इतकी झाली आहे. तर १०३३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचारपध्दतीचा अवलंब केला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. त्यामुळे मृत्यूंचा आकडा दिवसाला २ ते ३ वर येऊन ठेपला आहे. पूर्वी हाच आकडा प्रतिदिनी ५ ते ६ इतका होता. मृत्युदर कमी करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. त्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन आकड्यात घट झाली. महापालिकेने आतापर्यंत.४,१३,५९४ इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत.

यात आरटीपीसीआर १,५८,५२३ आणि २,५५,०७१ अ‍ँटिजेन टेस्टचा समावेश आहे. अनलॉकअंतर्गत महापालिकेने शहरातील बहुतांश व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची अनुमती दिली आहे. मात्र मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात धुणे व शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यालासुध्दा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. सध्या १,००१ रुग्ण महापालिकेच्या विविध केंद्रांत उपचार घेत आहेत.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु त्यादृष्टीने महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. 

महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यशमहापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. असे असले तरी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस