शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

CoronaVirus News : कोरोना रुग्णांचा ५० हजारांचा टप्पा पार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:14 IST

Navi Mumbai : रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या सक्षम उपाययोजनांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. असे असले तरी शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ८२ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून शहरात आतापर्यंत एकूण ५०,२९१ रुग्ण सापडले आहेत. असे असले तरी त्यापैकी ४८,२५७ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. शहरवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मार्चनंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत गेल्याने रुग्णांची एकूण संख्या ५०,२९१ इतकी झाली आहे. तर १०३३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचारपध्दतीचा अवलंब केला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. त्यामुळे मृत्यूंचा आकडा दिवसाला २ ते ३ वर येऊन ठेपला आहे. पूर्वी हाच आकडा प्रतिदिनी ५ ते ६ इतका होता. मृत्युदर कमी करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. त्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन आकड्यात घट झाली. महापालिकेने आतापर्यंत.४,१३,५९४ इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत.

यात आरटीपीसीआर १,५८,५२३ आणि २,५५,०७१ अ‍ँटिजेन टेस्टचा समावेश आहे. अनलॉकअंतर्गत महापालिकेने शहरातील बहुतांश व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची अनुमती दिली आहे. मात्र मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात धुणे व शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यालासुध्दा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. सध्या १,००१ रुग्ण महापालिकेच्या विविध केंद्रांत उपचार घेत आहेत.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु त्यादृष्टीने महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. 

महापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यशमहापालिकेने आखलेल्या उपाययोजनांना चांगले यश प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. असे असले तरी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस