शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Coronavirus : फळे-भाजीपाला मार्केट दोन दिवस बंद, आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 03:01 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो.

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजी व फळ मार्केट गुरुवार व रविवारी पूर्णपणे बंद करून मार्केटची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही सुरू केला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो. यामधील जवळपास ८० टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. येथील पाच मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी, वाहतूकदार व इतर मिळून जवळपास १ लाख नागरिक काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्केटमध्ये होऊ नये यासाठी बाजार समितीने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत भाजीपाला व फळ मार्केट प्रत्येक गुरुवारी व रविवारी बंद ठेवले जाणार आहे. दोन दिवसांमध्ये मार्केटमध्ये विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. मार्केटमधील सर्व पॅसेज धुऊन घेतले जाणार आहेत. कीटकनाशक फवारणी करून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापारी संघटनांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. मार्केटमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.भाजी व फळांव्यतिरिक्त कांदा, धान्य व मसाला मार्केटमधील स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. या तीन मार्केटमध्ये ओला कचरा जास्त नसतो. मार्केटमध्ये कुठेही कचरा साचणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. बाजार समितीमधील प्रत्येक घटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मार्केटमध्ये कोरोनाविषयी माहितीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. कोरोनाविषयी कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनाला देण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.कांदा मार्केटमध्ये स्वच्छता अभियानमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शनिवारी व रविवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संपूर्ण मार्केट, रस्ते धुतले. प्रसाधानगृहांचीही स्वच्छता करण्यात आली. कांदा मार्केट ३१ मार्चपर्यंत दोन तास लवकर बंद केले जाणार असून नियमित स्वच्छता केली जाणार आहे.मुुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाजी व फळ मार्केट गुरुवारी व रविवारी पूर्णपणे बंद करून तेथे विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.- अनिल चव्हाण,सचिव, मुंबई बाजार समितीकांदा-बाटाटा मार्केट पाण्याने पूर्णपणे धुऊन घेण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस विशेष मोहीम आयोजित केली होती. व्यापाºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.- अशोक वाळुंज,संचालक,कांदा मार्केटमार्केटमध्ये नियमित स्वच्छता राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. व्यापाºयांनी व ग्राहकांनी जास्तीत जास्त फोनवरून मालाची आॅर्डर घेऊन मार्केटमधील गर्दी कमी करावी, असे आवाहन केले आहे. आठवड्यातून दोन दिवस स्वच्छतेसाठी मार्केट बंद ठेवले जाणार आहे.- संजय पानसरे, संचालक फळ मार्केटउपाययोजना पुढीलप्रमाणेबाजार आवारातील महत्त्वाचे घटक असणारे आवक-जावक गेटवरील कर्मचारी, सुरक्षारक्षक, माथाडी, मापाडी कामगार यांना उपाययोजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.व्यापारी, अडते यांनाही त्यांच्या कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी फोन व आॅनलाइन आॅर्डर घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती