शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

coronavirus: शहरात कोरोनाला रोखण्यात दिघा विभाग आघाडीवर, नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 00:34 IST

Navi Mumbai coronavirus: कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांना यश येऊ लागले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कोरोनाला रोखण्यामध्ये दिघा विभाग आघाडीवर असून, २३० दिवस सातत्याने रुग्णसंख्या सर्वांत कमी ठेवण्यात यश आले आहे. नेरूळमध्ये सर्वांत जास्त रुग्ण मुक्त झाले असून, कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी घणसोलीत सर्वांत  जास्त आहे.कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बुधवारी शहरातील एकूण रुग्णसंख्या ४४,०५० झाली होती. त्यापैकी ४१,१७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, १९८६ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. सर्वांत कमी रुग्ण दिघा विभागामध्ये आहेत. मार्चपासून या परिसरात १,२१९ जणांना कोरोना झाला असून, त्यापैकी १,१६६ जण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सद्य फक्त ५३ रुग्ण शिल्लक आहेत. १३ मार्चपासून या परिसरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. झोपडपट्टी परिसरातील कामगिरी लक्षणीय आहे. नवी मुंबईमध्ये नेरूळ विभागातून सर्वाधिक ७,२८१ रुग्ण बरे झाले आहेत. नेरूळमध्ये ४१४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.१० टक्के आहे. सर्वाधिक ४४६ रुग्ण बेलापूरमध्ये शिल्लक आहेत. शहरातील मृत्युदर २ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आले आहे. 

दिवाळीमध्ये विशेष काळजी घ्या नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी दिवाळीच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. सण, उत्सवामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी होऊ लागली आहे. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले. आयुक्त अभिजित बांगर यांनी जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण वाढले तरी चालतील  पण एकही मृत्यू होणार नाही यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून, त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिणामी, नवी मुंबईतील  कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.  

घणसोलीमध्ये सर्वाधिक ९५.११ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तेथील ५,३९७ रुग्णांपैकी ५,१३३ रुग्ण बरे झाले असून, आता फक्त १६४ रुग्ण शिल्लक आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई