शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Coronavirus: भाजीपाल्याची आवक घटली; एपीएमसीत केवळ ४0 वाहने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:59 IST

व्यापाऱ्यांनी मालच मागविला नाही

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला असून आवक घटली आहे. शनिवारी भाजीपाला मार्केटमध्ये फक्त ४० वाहनेच आली आहेत.

मुंबई व नवी मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहवा, यासाठी शासनाने एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरू ठेवली आहेत; परंतु मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार १ मेपर्यंत पाच मार्केटमध्ये २६ रुग्ण आढळले आहेत. मार्केटमधील रुग्णांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाली असून एपीएमसी मार्केटबाहेरील फळ विक्रेत्यालाही लागण झाली आहे. यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजीपाला मार्केटमध्ये दोन दिवसांपासून आवक घटली आहे. शुक्रवारी ९५ ट्रक व टेंपोतून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. शनिवारी फक्त ४० वाहनांचीच आवक झाली आहे. सुरक्षेसाठी घरातच थांबा, असे आवाहन व्यापारी संघटनेने यापूर्वीच केले आहे. यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. फळ व धान्य मार्केटमध्ये आवक समाधानकारक होत आहे; परंतु मसाला व कांदा-बटाटा मार्केटमधील आवक घटली आहे. एपीएमसीमधील रुग्णांची संख्या वाढत राहिली तर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्या