शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Coronavirus: कोरोनाच्या नियंत्रणात फेरीवाल्यांची बाधा; नवी मुंबईतील प्रशासन गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 01:43 IST

बाधितांकडूनही होतोय व्यवसाय

नवी मुंबई : प्रशासन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतानाच, शहरातील विनापरवाना फेरीवाले त्यात बाधा ठरत आहेत. फेरीवाल्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक ठिकाणी कोरोनाबाधित किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून पालिकेने काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी मुभा दिली होती. याच संधीचा फायदा घेऊन कोणतीही खबरदारी न घेता व्यवसाय करणारे फेरीवाले प्रत्येक नोडमध्ये पाहायला मिळत आहेत. बहुतांश विक्रेते एपीएमसी मार्केटमधून मालाचीे खरेदी करून विक्री करणारे आहेत. अगोदरच मार्केटमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याने, त्यांच्याकडून स्वत:च्या, तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर २ मधील एका भाजी विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान त्याच्या पत्नीला क्वारंटाईन करण्याची गरज असतानाही तसे न झाल्याने तिच्याकडून व्यवसाय सुरूच होता. अखेर पतीच्या निधनानंतर परिसरात चर्चा पसरल्यानंतर, त्यांच्याकडे भाजीखरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली होती.

असाच प्रकार कोपरखैरणे सेक्टर ७ व १५ येथे पाहायला मिळत आहे. एपीएमसी मार्केटशी संबंधित असलेल्या कुटुंबाकडून तिथल्या परिसरात भाजीपाला विक्रीसाठी मांडला जात आहे, परंतु त्यापैकी अनेकांच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत. अशाच प्रकारे सेक्टर ७ मधील एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती पॉझिटिव्ह असतानाही त्याच कुटुंबातील काही व्यक्तींनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे संसर्ग पसरण्यास हातभार लागत आहे.सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळया विरोधात काहींनी आवाज उठवून संसर्ग टाळण्यासाठी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, परंतु राजकीय वरदहस्त मिळवत, हे फेरीवाले सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचीही चाचणी करून ज्यांच्या कुटुंबात रुग्ण आढळला नसेल, अशांनाच व्यवसायाची मुभा देण्याची मागणी होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या कोरोनाच्या विरोधातील मोहिमेचा फेरीवाल्यांकडून फज्जा उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस