शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

Coronavirus : खारघरच्या ग्रामविकास भवनात कोरोना विलगीकरण केंद्र, महापालिका आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 02:25 IST

पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर शहरातील ग्रामविकास भवनात कोरोना संशयित अथवा विदेशवारी करून आलेल्या नागरिकांसाठी १५0 खाटांचे विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी ९ जण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे खेळाडू पनवेलमधून दुबईला गेले होते. उर्वरित ७ जण राज्यातील विविध भागांतील असल्याने त्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व शासकीय व साप्ताहिक सुट्ट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी चारही प्रभाग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यलय, खासगी शाळा, महाविद्यालये, निमशासकीय संस्था, अंगणवाड्या, बालवाड्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाºयांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबत निश्चित ठिकाणांना भेट देण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या काही नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयातून पळ काढण्याचादेखील प्रयत्न केला. या वेळी अशा नागरिकांना पालिकेच्या पथकाने शोधून काढले आहे. त्यांना खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत सुमारे ३0 ते ४0 जण दुबईवरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. सर्वांवर पालिकेची नजर आहे. काही जण घरातच स्वतंत्र खोलीत पालिका अधिकाºयांच्या निगराणीत थांबले आहेत.ग्रामविकास भवनातून कर्मचारी गायबपरदेश वारी करून आलेल्या नागरिकांना सतर्कता म्हणून खारघर शहारातील ग्रामविकास भवन येथे तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. मात्र ही बातमी ऐकताच येथील कर्मचाºयांनी ग्रामविकास भवनातून पळ काढला. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाला येथील प्रशासनाच्या मार्फत कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नाही. संबंधित नागरिक कोरोना संशयित आहेत असा समज ग्रामविकास भवनातील कर्मचाºयांचा झाल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर करत येथून पळ काढला. याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. कर्तव्य बजावण्याच्या वेळेला अशा प्रकारे पळ काढणे ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.इंडिया बुल्सच्या इमारतीमध्ये सामग्रीची कमतरतामोठ्या संख्येने विदेशातुन येणाºया नागरिकांना एकाच ठिकाणी विलगीकरण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोन येथील इंडिया बुल्सच्या कोन गावा जवळील रेंटल हौसिंग स्कीममधील बिल्डिंग क्रमांक ३ व ४ याठिकाणी १८ माळ्याच्या इमारतीत १००० खोल्यामध्ये विलगीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना पनवेलचे महापालिका आयुक्तांना केल्या होत्या. मात्र संबंधित क्षेत्र पालिका कक्षेबाहेर असल्याने तसेच त्याठिकाणी संसाधनाची कमतरता लक्षात घेता आयुक्तांनी त्याठिकाणी विलगीकरण केंद्र तयार करणे शक्य नसल्याचे सांगत खारघर शहरातील ग्रामविकास भवनाची निवड केली. यासंदर्भातील माहिती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयालाही कळवली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई