शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

coronavirus: कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:15 IST

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही मार्केट सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी फळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी शिल्लक मालाची विक्री करण्यावर भर दिला. रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही व्यापारी आणि विक्रेत्यांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले.नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. विशेष म्हणजे, एपीएमसीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. तर शहरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास २४५ रुग्ण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत. राज्य शासनाने सोमवारपासून १७ मेपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पुरेल इतका अन्नधान्य आणि भाज्यांचा पुरवठा मुंबई शहराला करण्याच्या सूचना राज्य शासनाने एपीएमसी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार शनिवार जीवनावश्यक वस्तूंंच्या एक हजार गाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. तर रविवारी कृषिमालाच्या ६२१ गाड्या एपीएमसीतून बाहेर गेल्या आहेत. यात भाजीपाला १५५, कांदा-बटाटा १४, फळे ११२, मसाला १०५ आणि अन्नधान्याच्या २३५ गाड्यांचा समावेश आहे. बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी भाजीपाला, फळे आणि कांदा बटाटा यांचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस भाजीपाल्यांची कमतरता जाणवणार नसल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट आले आहे. दरम्यान, सोमवारपासून बाजारपेठा बंद राहणार असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या आणि फळे खरेदीसाठी बाजारपेठेत रविवारी गर्दी केल्याचे दिसून आले.स्थानिक बाजारात गर्दीएपीएमसी मार्केट सोमवारपासून बंद राहणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी रविवारी स्थानिक बाजारपेठेत गर्दी केली. आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला, फळे खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला. प्रत्येक नोडमध्ये तसेच मोकळ्या जागेत भरणाºया बाजारात गर्दी होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसली. अन्नधान्य व भाजीपाल्याच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिक कोरोनापासून बचावाकडे दुर्लक्ष होताना दिसले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या