शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
3
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
4
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
5
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
7
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
8
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
11
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
12
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
13
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
14
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
15
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
16
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
17
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
20
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण

रायगडमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी उपचारानंतर ५७ टक्के रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात हे दिलासादायक चित्र आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मुंबई, पुणे, ठाणे, सुरत यासह अन्य ठिकाणांहून १ मे २०२० नंतर जिल्ह्यात ९६ हजार नागरिक आले आहेत. खारपाडा येथील चेकपोस्टवरच त्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात येत आहे.

१० हजार नागरिकांना निरीक्षण कक्षात दाखल केले आहे, तर ८६ हजार नागरिक हे होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यातील बहुतांश नागरिकांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १ मे रोजी रायगड जिल्ह्यात १०५ कोरोनाबाधित होते. आता हाच आकडा ८४० च्याही पुढे गेलेला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आल्यानंतर बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचेही प्रमाण ५७ टक्के एवढे आहे.

तब्बल ४८२ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. बाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असल्याने अलिबाग नेहुली येथील क्रीडा संकुल आणि कुरुळ वसाहतीमधील आरसीएफची शाळा अधिग्रहीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार होणार आहेत.

विक्रम-मिनीडोरला अटींवर परवानगी

१. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार विक्रम-मिनीडोर रिक्षा आहेत. त्यावर ६० हजारांहून अधिक कुटुंबांचा चरितार्थ चालतो; मात्र लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा व्यवसाय ठप्प पडला आहे.

२.विक्रम-मिनीडोर चालक-मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी संघटनेने मागणी केली होती.

३.चौथ्या लॉकडाउनमुळे नियमांमध्ये शिथिलता आली आहे. त्यानुसार सामाजिक अंतर राखून आणि सहाऐवजी तीन प्रवासी घेऊन विक्रम-मिनीडोर रिक्षाचा व्यवसाय करण्याला मुभा आहे. मात्र संबंधितांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड