शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील नागरिकांवर कोरोनामुळे मानसिक ताण, जगायचे कसे हा प्रश्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:46 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता.

योगेश पिंगळे -नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक ताण वाढला आहे. मला कोरोना झालाय, मी बरा होईन ना, मी सर्व काळजी घेतली होती, तरी कसा कोरोना झाला, असे अनेक प्रश्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पडत आहेत. त्यांच्यात एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली असून, रोजगार बंद असल्याने या काळात जगायचे कसे, असादेखील प्रश्न पुढे उभा राहिला आहे. नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचारतज्ज्ञांची टीम तयार केली असून, कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता. त्यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर त्याच्याकडे पाहण्याचा तसेच त्याला मदत करण्याचा दृष्टिकोन नागरिकांमध्ये नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाबत असलेले अनेक संभ्रम दूर झाले आहेत; परंतु या लाटेमध्ये कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने वेगळी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्याने अनेकांचे रोजगार बंद आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या असून, उत्पन्न बंद असल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हफ्ते, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार आदी खर्च कसा करायचा, याची चिंता लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, या काळात कुटुंबातील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आता नक्की काय करायचे, कुटुंबातील इतर व्यक्तींना बाधा तर होणार नाही ना, रुग्णालयात बेड मिळेल का, शारीरिक जुन्या काही व्याधी असल्याने मला काही होईल का, मला काही झाल्यास माझ्या कुटुंबाचे कसे होणार, असे अनेक प्रश्न पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनात निर्माण होत आहेत. नागरिकांचे समुपदेशन करून मनोबल वाढविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून हेल्पलाइनची सुविधा सुरू करून देण्यात आली आहे. विविध प्रश्नांसाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे कौन्सिलिंग  करून रिलॅक्सेशन थेरपी दिली जात आहे. तसेच त्या रुग्णांचा  पुन्हा फॉलो अप घेऊन त्यांची विचारपूस करून धीर दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी तयार केलेली कौन्सिलिंगची हेल्पलाइन सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.  

रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.. काय करू?कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर अनेक रुग्ण पॅनिक होतात. त्यावेळी आता नेमके काय करायचे हे कळत नसल्याने तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या काळजीपोटी हेल्पलाइनवर कॉल करून शंकांचे निरसन आणि मार्गदर्शन करून घेतात.  

कॉल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत; परंतु कोरोनामुळे अनेक कुटुंबे बाधित झाली असून, कोविड रुग्णांमध्ये डिप्रेशन वाढले आहे. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी किंवा मनात येणाऱ्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

मागच्या वर्षी कोरोनामध्ये नागरिकांची मानसिक स्थिती वेगळी होती. परंतु या लाटेमध्ये कोविड झाला म्हणजे आपल्या आयुष्याचे काही तरी होत आहे, असा समज कोविड रुग्णांमध्ये निर्माण होतो. कोविड आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही. त्यामुळे चिंता न करता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षा नियमांचा वापर करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही शंका असल्यास चिंता करण्याची गरज नाही. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. - डॉ. योगीता सोळंके, मानसोपचारतज्ज्ञ

तरुणांना कुटुंबाची काळजी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनादेखील कोरोनाची लागण होईल का, किंवा आपल्याला काही झाल्यास आपल्या कुटुंबाचे काय होईल, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहत असून, ते मानसिक तणावाखाली येत आहेत. अशा व्यक्तींना हेल्पलाइनच्या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या कौन्सिलिंगमुळे खूप फायदा होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईdoctorडॉक्टर