शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नवी मुंबईत कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर कमी, शहरातील नागरिक बेफिकीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:11 IST

नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती.

योगेश पिंगळे -नवी मुंबई :  शहरातील नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी ८० ते ८५ टक्क्यांवर पोहचली होती परंतु विविध कारणांमुळे ही विक्री देखील १० ते १५ टक्क्यांवर आली आहे.नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळे सॅनिटायझरने हातांची स्वच्छता केल्यास सुरक्षित राहिले जाऊ शकते अशी नागरिकांची समजूत झाली होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझरचा वापर करू लागला होता. सॅनिटायझरच्या  वाढलेल्या मागणीमुळे बाजारात अनेक ठिकाणी सॅनिटायझरची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे कंपन्यांनी सॅनिटायझरचे दर देखील वाढविले होते. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने शासनाच्या सूचनेनुसार दर निम्मे करण्यात आले होते. याकाळात शासन, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करताना  सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर काही प्रमाणात सॅनिटायझरची मागणी घटली. कोरोनाकाळात कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःकडे सॅनिटायझर बाळगत होते परंतु आता अनेक नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत.  तसेच सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत. 

सॅनिटायझरची विक्री १५ टक्क्यांवरकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हातांची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायझरला प्राधान्य दिले जात होते. सॅनिटायझरची  मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी बाजारात विविध सुगंध, रंगांचे सॅनिटायझर विक्रीसाठी आणले होते. सुरुवातीला यांचे दर देखील जास्त होते. तरी देखील नागरिक सॅनिटायझर खरेदी करत होते. परंतु आता नागरिक कोरोनाची भीती नसल्यासारखे वागत असून पूर्वीप्रमाणे नियमाचे आणि स्वच्छतेचे पालन करत नाहीत.  त्यामुळे सॅनिटायझरचा वापर देखील कमी झाला असून पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरची विक्री सुमारे १५ टक्क्यांवर आली आहे.  

कोरोनाच्या सुरुवातीला सॅनिटायझर फक्त मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होते. आता सर्वच दुकानांमध्ये विक्री होत आहे. गेल्यावर्षी सॅनिटायझरला प्रचंड प्रमाणात मागणी होती. परंतु कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नसताना काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, अनेक नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. अनेकांना सॅनिटायझर परवडत नसल्याने साबण वापरत आहेत. अशा विविध कारणांमुळे पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.- राकेश नलावडे, नवी मुंबई केमिस्ट असोसिएशन - अध्यक्ष

आम्ही साबण वापरायला लागलोकोरोनापासून संरक्षण होण्यासाठी आता साबणाचा वापर करतो. कार्यालय, बँक आदी ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या सॅनिटायझरचा वापर करतो.- शशिकांत म्हात्रे, नागरिक

कोरोनाकाळात घरात वापरासाठी सॅनिटायझर खरेदी करत होतो.  परंतु साबणाच्या तुलनेत सॅनिटायझर महाग असल्याने घरी स्वच्छतेसाठी साबण वापरतो.  परंतु घराबाहेर जाताना सोबत सॅनिटायझर बाळगून त्याचा वापर करतो.- अक्षय बारवे, नागरिक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस