शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 01:01 IST

घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

अनंत पाटीलनवी मुंबई : ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्हा साष्टी तालुक्याचा भाग म्हणून संबोधला जात असे. आताच्या ठाणे शहराच्या पूर्वेस खाडी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला असून त्या किल्ल्याचे रुपांतर आता ठाणे तुरुंगात झाले आहे. याच तुरुंगात ब्रिटिश सरकारने ज्वलंत क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली होती. असंख्य देशभक्तांना लोखंडी गजाआड डांबून ठेवले म्हणून हे ठाण्याचे कारागृह स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे होते. घणसोली गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारी “स्वातंत्र्यसंग्राम चौक” वास्तू आहे.

महादेव काळदाते,डॉ.देसाई,दत्तू वाळक्या, वाल्मिक कोतवाल,वकील दामले यांच्या नेतृत्वाखाली ३० जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. यात घणसोली येथील बामा म्हात्रे, सोमा कोळी, फकीर पाटील, राघो पाटील, कमला म्हात्रे, जोमा मढवी, पांडुरंग बोंद्रे, शंकरबुबा पाटील, रामा रानकर, वामन पाटील, सीताराम बामा, रघुनाथ पवार,नारायण मढवी, चाहु पाटील, हाल्या म्हात्रे, महादू पाटील, वाल्मिक पाटील, वाळक्या पाटील परशुराम  पाटील आदींनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ घेऊन घोषणा देत सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी लाठीमार केला. त्यात गोठीवली गावच्या कान्हा म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाल्याने अपंगत्व आले. त्याच कालावधीत दिघा, ऐरोली, दिवा, रबा‌ळे, तळवली, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, बेलापूरपर्यंत  बैठका घेऊन जनजागृती केली. १९४२ पर्यंत या सत्याग्रहींनी ब्रिटिशांची रेल्वे सेवा बंद होण्यासाठी रूळ काढण्याचे प्रकार केले, विजेचे खांब तोडणे,टेलिफोनच्या तारा कापून टाकणे याकामी जनजागृती केली. घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

माफीनामा लिहून दिला तरच सुटका १ जानेवारी १९३१ रोजी विलेपार्ले येथील परिषदेत घणसोली छावणीत सत्याग्रहींनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तेव्हा त्यांना पकडून अंधेरीच्या तुरुंगात डांबले. १६ फेब्रुवारी १९३२ मध्ये घणसोली गावात तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्याने ब्रिटिशांनी अनेकांना अटक करून ठाण्याच्या तुरुंगात टाकले. प्रत्येकाच्या घरातील भांडीकुंडी जप्त करून माफीनामा लिहून दिला तरच सुटका होण्याचे फर्मान काढले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन