शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

घर खरेदीत फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्यायालयाकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : घर खरेदी करणाºया ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा ग्राहकांना दिला जात नाही, उलट कायदेशीर प्रक्रियेत ग्राहकांची फसवणूक केली जाते. उलवे नोड मधील सेक्टर १७मधील असाच प्रकार उघडकीस आला आहे. जागामालक कंपनीने विकासक व ग्राहकांची अडवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : घर खरेदी करणाºया ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा ग्राहकांना दिला जात नाही, उलट कायदेशीर प्रक्रियेत ग्राहकांची फसवणूक केली जाते. उलवे नोड मधील सेक्टर १७मधील असाच प्रकार उघडकीस आला आहे. जागामालक कंपनीने विकासक व ग्राहकांची अडवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जमीनमालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकूण ५८ कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.उलवे नोड सेक्टर १७मधील विश्रृत इन्फोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा भूखंड विकसित करण्यासाठी श्रीजी असोसिएटस या कंपनीला दिला होता. २०१३ साली ५० टक्के हिश्श्याचा करारनामा करून २७ सदनिका आणि २ गाळे जमीनमालक म्हणजे विश्रृत इन्फोटेकला देण्याचा कंपनीशी करण्यात आला. उर्वरित ५८ सदनिका आणि गाळे विकासकाच्या मालकीचे होणार होते. २०१४मध्ये इमारत विकासाचे काम वेगाने सुरू असताना विश्रृत इन्फोटेक कंपनीने विकसकाच्या मदतीने त्यांच्या मालकीच्या सदनिका आणि गाळे विकण्यास सांगितले. सदनिका आणि गाळे विकून आलेली १४ कोटी २० लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे विश्रृत इन्फोटेक कंपनीला देण्यात आली. वेळोवेळी देण्यात आलेली रक्कम कंपनीने स्वीकारली आहे. तोपर्यंत विकासक श्रीजी असोसिएटस कंपनीने त्यांच्या हिश्श्याच्या ५८ सदनिका ग्राहकांना विकल्या होत्या. संबंधित इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर मात्र विश्रृत इन्फोटेक कंपनीने विकासक आणि त्यांच्यातील व्यवहार नाकारण्यास सुरुवात केली. करारनामे असताना, सर्व व्यवहार चेकने झालेले असताना सर्व सदनिका व गाळ्यांवर हक्क सांगू लागले. विशेष म्हणजे भूखंड विकासकाच्या नावे करण्याकरिता विश्रृत इन्फोटेक कंपनीचे मालक विश्रृत त्रिपाठी यांनी सिडकोकडे केलेला अर्जदेखील आजमितीला प्रलंबित आहे.मागील चार वर्षे बिल्डर आणि जमीनमालकाच्या वादामुळे इमारतीचे उरलेले २० टक्के काम पूर्ण झाले नाही. घर बुक केलेले ५८ कुटुंबे यामुळे वेठीस धरलेली आहेत. अखेर विकासकाने जमीनमालक त्रास देत असल्याबाबत वाशी पोलीस ठाण्यासह नवी मुंबई पोलिसांकडे दाद मागितली.पोलिसांनी दाद न दिल्यामुळे विकासक श्रीजी असोसीएटसचे मालक विश्रृत इन्फोटेकचे अरुण त्रिपाठी, मीना त्रिपाठी, निशांत त्रिपाठी, विश्रृत त्रिपाठी या चौघांविरोधात न्यायालयात दाद मागितली. वाशीच्या सह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश वाशी पोलिसांना दिले.येत्या दोन दिवसांत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता तक्रारदार जिग्नेश गोराडिया यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई