शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यातही कंजुषी

By admin | Updated: February 24, 2017 08:04 IST

तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेने स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक

नामदेव मोरे / नवी मुंबई तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेने स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुख्यालय उभारण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च केले, पण त्याच्यासमोरील बेलापूर किल्ल्याचा बुरूज व प्रत्यक्ष किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक रुपयाही खर्च करता आलेला नाही. स्वातंत्र्य सैनिक व ऐतिहासिक वारसास्थळांसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाणार, असा प्रश्न इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत. नवी मुंबई वसली ती भूमिपुत्रांच्या त्यागावर. येथील मूळ निवासी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे सिडको, महापालिका व शासनाने दुर्लक्ष केलेच, पण येथील ऐतिहासिक वारस्थळांचे जतन करण्यातही अपयश आले आहे. घणसोली गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ग्रामस्थांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. मुंबई व ठाण्यामधील नेत्यांचे संदेश कोकणापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे काम केले होते. स्वातंत्र्य लढ्याची चळवळ मोडीत काढण्यासाठी इंग्रजांनी छावणी उभारली, पण ग्रामस्थांनी इंग्रजांविरोधात असहकार्य पुकारले. एकाही दुकानातून त्यांना साहित्य दिले जाणार नाही याची काळजी घेतली. दबावाला बळी न पडता लढा सुरूच ठेवला. जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर गोकुळाष्टमी महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येवून लढा सुरूच ठेवला. या लढ्याची आठवण म्हणून घणसोलीमध्ये छोटे स्मारक उभारले आहे. पण सद्यस्थितीमध्ये त्याची दुरवस्था झाली आहे. भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता आहे. यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कामाची सविस्तर माहिती, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो व इतर माहिती असणे आवश्यक आहे. महापालिका प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करते, परंतु प्रत्यक्षात स्मारक उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व शहिदांचे स्मारक उभारण्याचेही प्रस्तावित आहे, पण अद्याप त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला नाही. बेलापूर किल्ला हे नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक ठिकाण आहे. १५६० मध्ये बांधकाम केलेला व १७३३ मध्ये चिमाजी आप्पांनी जिंकलेला हा किल्ला शेवटची घटका मोजत आहे. किल्ला सिडको कार्यक्षेत्रामध्ये येत असला तरी महापालिकेच्या मुख्यालयासमोर किल्ल्याचा एक बुरूज आहे. किल्ल्याचा हा बुरूज आजही सुस्थितीमध्ये आहे, पण देखभाल केली जात नसल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. महापालिकेने पामबीच रोडवर २०० कोटी रूपये खर्च करून भव्य मुख्यालय बांधले आहे. पण मुख्यालयाच्या समोर असलेल्या या बुरूजाच्या देखभालीसाठी २०० रूपयेही खर्च केलेले नाहीत. फक्त अर्थसंकल्पात तरतूद करून खोटी आश्वासने देण्यावरच लक्ष दिले जात आहे.