शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई दयावी, काँग्रेसची मागणी

By योगेश पिंगळे | Updated: April 20, 2023 20:18 IST

ही मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली.

नवी मुंबई : खारघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना शासनाने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परंतु ही भरपाई म्हणजे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असून सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी या सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.

खारघर येथे राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची संख्या सुमारे 50 इतकी असल्याचा अंदाज अजून 200 श्री सदस्य जखमी तर 80 श्री सदस्यांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे सांगत सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप यावेळी हुसेन यांनी केला. मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत आणी श्री सदस्यांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcongressकाँग्रेस