शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई दयावी, काँग्रेसची मागणी

By योगेश पिंगळे | Updated: April 20, 2023 20:18 IST

ही मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली.

नवी मुंबई : खारघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना शासनाने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परंतु ही भरपाई म्हणजे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असून सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी या सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.

खारघर येथे राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची संख्या सुमारे 50 इतकी असल्याचा अंदाज अजून 200 श्री सदस्य जखमी तर 80 श्री सदस्यांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे सांगत सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप यावेळी हुसेन यांनी केला. मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत आणी श्री सदस्यांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcongressकाँग्रेस