शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई दयावी, काँग्रेसची मागणी

By योगेश पिंगळे | Updated: April 20, 2023 20:18 IST

ही मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली.

नवी मुंबई : खारघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना शासनाने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परंतु ही भरपाई म्हणजे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असून सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी या सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.

खारघर येथे राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची संख्या सुमारे 50 इतकी असल्याचा अंदाज अजून 200 श्री सदस्य जखमी तर 80 श्री सदस्यांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे सांगत सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप यावेळी हुसेन यांनी केला. मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत आणी श्री सदस्यांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcongressकाँग्रेस