शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

डायरेक्ट टू होम संकल्पनेचा बोजवारा; किराणा माल, भाजीपाला लॉकडाऊनमध्ये अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:20 IST

नागरिकांमध्ये नाराजी

अलिबाग : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच किराणा आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा दावा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला होता. मात्र, अद्यापही जिल्हा प्रशासन अशी कोणती व्यवस्था निर्माण करू शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भा$वाला अटकाव करण्यासाठी १६ जुलैपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेडिकल आणि दूध वगळता भाजीपाला आणि किराणा मालाच्या विक्रीवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

महानगरात फोफावलेला कोरोना विषाणू सुरुवातीला ग्रामीण भागात पोहोचला नव्हता. मात्र, चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने, तसेच ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-पुणे, ठाणे या विभागातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्ह्यात आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या स्तरावर तीन ते सात दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याला सुरुवात केली. मात्र, एका ठिकाणी लॉकडाऊन असताना दुसऱ्या ठिकाणी मोकळीक होती. त्यामुळे अशा प्रकारचे लॉकडाऊन फोल ठरत होते, तर दुसरीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकार आणि प्रशासनासह नागरिकांची चांगलीच झोप उडाली होती. यावर तातडीने उपाययोजना करण गरजेचे असल्याने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागातील प्रमुख यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये १६ जुलै ते २६ जुलै, २०२० या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला.

किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असल्याने, त्या वस्तूंच्या खरेदीवर थेट निर्बंध आणत, त्यांना लॉकडाऊनचे कक्षेत आणण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून अशा वस्तूंची घरपोच सेवा देण्यावर भर देणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

अलिबागमधील काही किराणा मालाच्या दुकानदांराशी संपर्क साधला असता, आमच्याकडे कोरोनामुळे कामाला माणसे कमी आहेत, त्यामुळे यंत्रणा उभी कराला वेळ लागेल, असे सांगण्यात आले. काही भाजीविक्रेते हे ओळखीच्या ठिकाणी, तसेच नेहमीच्या ग्राहकांकडे भाजीपाला पोहोचवण्याचे काम करत असल्याचेही सांगण्यात आले. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीत, अशा नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये किराणा माल आणि भाजीपाला घरपोच मिळणार होता. मात्र, अद्याप तशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी अजून सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सरकार आणि प्रशासनाने तशी व्यवस्था करावी.- किशोर देशमुख, रहिवासी, अलिबाग

मागच्या दाराने विक्री सुरू?

जिल्ह्यामध्ये असे काही व्यापारी, दुकानदार आहेत की, जे नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अथवा स्वत:च्या फायद्यासाठी मागच्या दाराने दुकानाची दारे उघडी ठेवत आहेत. वस्तूंची खरेदी करण्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते, परंतु ज्यांना असे पर्याय माहिती नाहीत, अथवा बाहेरच पडता येत नाही. त्यांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी मद्यविक्रीही मागच्या दाराने होत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई