शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सदस्यनिवडीचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:40 IST

स्थगिती उठविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष : पालिका निवडणुकीपर्यंत जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन समितीच्या सदस्यनिवडीच्या प्रक्रियेस जुलै २०१९ मध्ये शासनाने स्थगिती दिली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर शासनाने हा निर्णय घेतला होता. सात महिन्यांनंतरही सदस्य व सभापतीनिवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नसल्यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, नगरविकास खाते शिवसेनेकडे असतानाही परिवहन सदस्य निवडीची स्थगिती उठविली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरवासीयांना दर्जेदार वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. परिवहन समितीवर महापालिकेमधील नगरसेवकांच्या संख्याबळावर विविध पक्षांच्या १२ सदस्यांची निवड केली जाते. स्थायी समिती सभापती परिवहनचे पदसिद्ध सदस्य असतात. प्रत्येक दोन वर्षांनी सहा सदस्य निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा नियुक्ती केले जातात. जुलै २०१९ मध्ये सहा सदस्य निवृत्त होणार असल्यामुळे महापालिकेने निवडप्रक्रिया सुरू केली होती. पहिल्यांदाच संख्याबळाऐवजी मतदान घेऊन निवड करण्याचे निश्चित केले व तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने त्यांच्याच सर्व सदस्यांची निवड जाहीर केली. या निवडीला शिवसेनेने आक्षेप घेतला. गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडून २० जुलैला निवडप्रक्रियेला स्थगिती दिली, तेव्हापासून अद्याप स्थगिती उठविण्यात आलेली नाही. जवळपास सात महिन्यांपासून सभापतीची निवड झालेली नाही व सदस्यांना कामकाजामध्ये सहभागही घेता येत नाही. परिवहनचे सर्व कामकाज प्रशासन करत असून, धोरणात्मक प्रस्ताव मंजुरीसाठीथेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येत आहेत.

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना शिवसेना व काँगे्रसच्या सदस्यांनी स्थगिती उठविण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती; परंतु सद्यस्थितीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून फारसा प्रयत्न होत नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. शिवसेना सदस्यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करून स्थगिती उठवावी, अशी मागणीही होत आहे. परिवहन सदस्य अ‍ॅड. अब्दुल जब्बार खान यांनी परिवहन सभापतीची निवड घेण्यात यावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी महापौर, परिवहन व्यवस्थापक, नगरसचिव व शासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. परिवहन उपक्रमाचे नुकसान होत आहे. सात महिन्यांपासून समिती बरखास्त आहे. यामुळे अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे परिवहनचे कामकाज सदस्यांना करता आलेले नाही. परिवहनचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी स्थगिती उठवावी व सभापतींची नियुक्ती करावी, यासाठीही त्यांनी पाठपुरावा सुरू केला असून विद्यमान सरकार महापालिका निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामकाजावर परिणाममहापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात जवळपास ४७५ बस आहेत. जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त प्रवासी रोज परिवहनच्या बसमधून प्रवास करत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल, उरण ते खोपोलीपर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या बस प्रवाशांना सुविधा देत असून, बेस्टनंतर सर्वोत्तम परिवहन सेवा देणारी आस्थापना म्हणून ओळख आहे; परंतु सात महिन्यांपासून परिवहन समिती सदस्यनिवडीच्या गोंधळामुळे कामकाजावर परिणाम होत असून हा घोळ थांबवावा, अशी मागणी परिवहन सदस्यांनी केली आहे.परिवहन समिती सदस्य नियुक्तीला शासनाने स्थगिती दिली आहे. सात महिन्यांपासून महापालिकेने सभापतींची निवड केलेली नाही. स्थगितीही उठविलेली नाही. कामकाज महासभा पाहत असून, तसा आदेश कोणी दिला हेही माहीत नाही. याविषयी आम्ही महापालिका व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून अद्याप शासनानेही ठोस निर्णय घेतलेला नाही.- अ‍ॅड. अब्दुल जब्बार खान,परिवहन सदस्यसभापतिपद जाण्याची भीती : महापालिका निवडणुकीपूर्वी परिवहन समिती सदस्य निवडीची स्थगिती उठविली तर भाजपचा सभापती होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका निवडणुकीपर्यंत स्थगिती जैसे थे ठेवण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचे खासगीत बोलले जात आहे. निवडणुकीनंतरच परिवहन समितीविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.३०० कोटींचा अर्थसंकल्प : महापालिका परिवहन उपक्रमाचे २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्प मंजुरीनंतर दोन महिने लोकसभा निवडणुकीमुळे कामकाज होऊ शकले नाही. मे व जून दोन महिने कामकाज करता आले व जुलैमध्ये सदस्य निवडीस स्थगिती देण्यात आली. यामुळे अर्थसंकल्प मंजूर करणाºया सदस्यांना त्यामधील तरतुदीप्रमाणे कामकाज करता आलेले नाही. याविषयी खंत सर्वच पक्षाचे सदस्य व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई