शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक धडकणार मुंबईत

By admin | Updated: April 9, 2016 02:22 IST

मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे

बिरवाडी : मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे राज्यातील सुमारे २७ हजार संगणक परिचालक १२ एप्रिलला मुंबई येथे विधान भवनवर धडकणार असल्याची माहिती राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.मागील ४ वर्षात ग्रामविकास विभागामार्फत महाआॅनलाइनकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानुसार प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग ३ वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्र मांकावर ठेवला. तरीही कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून महाआॅनलाइनने ४ वर्षात मानधन, स्टेशनरीमध्ये शेकडो कोटी रु पये हडप केलेले आहेत. संगणक परिचालकांना ५० रु ., २०० रु ., ५०० पासून ३८०० असे तुटपुंजे मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे ४ संगणक परिचालकांनी आत्महत्या केल्या आणि राहुल चौखंद्रे यांचानागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ८ दिवस चाललेल्या आंदोलनात मृत्यू झाला. त्यावेळी शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांनी २२ डिसेंबर २०१५ ला आश्वासन देऊन १५ जानेवारी २०१६ पर्यंत निर्णय देऊ असे सांगितले होते,परंतु एप्रिल आला तरी शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे राज्य संघटनेच्या निर्णयानुसार १२ एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यसचिव कांबळे यांनी सांगितले.