शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

संगणक परिचालक धडकणार मुंबईत

By admin | Updated: April 9, 2016 02:22 IST

मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे

बिरवाडी : मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे राज्यातील सुमारे २७ हजार संगणक परिचालक १२ एप्रिलला मुंबई येथे विधान भवनवर धडकणार असल्याची माहिती राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.मागील ४ वर्षात ग्रामविकास विभागामार्फत महाआॅनलाइनकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानुसार प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग ३ वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्र मांकावर ठेवला. तरीही कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून महाआॅनलाइनने ४ वर्षात मानधन, स्टेशनरीमध्ये शेकडो कोटी रु पये हडप केलेले आहेत. संगणक परिचालकांना ५० रु ., २०० रु ., ५०० पासून ३८०० असे तुटपुंजे मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे ४ संगणक परिचालकांनी आत्महत्या केल्या आणि राहुल चौखंद्रे यांचानागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ८ दिवस चाललेल्या आंदोलनात मृत्यू झाला. त्यावेळी शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांनी २२ डिसेंबर २०१५ ला आश्वासन देऊन १५ जानेवारी २०१६ पर्यंत निर्णय देऊ असे सांगितले होते,परंतु एप्रिल आला तरी शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे राज्य संघटनेच्या निर्णयानुसार १२ एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यसचिव कांबळे यांनी सांगितले.