शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

‘स्वदेश’च्या पाणीपुरवठा योजनेबाबत तक्रार

By admin | Updated: May 6, 2017 06:07 IST

स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. स्वदेशच्या ठेकेदारामार्फत कमी गुणवत्तेचा पाइप वापरल्याचा आरोप सुरू असतानाच बुधवारी महाड तालुक्यातील वारंगी ग्रामपंचायतीने गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत महाड प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये स्वदेश फाउंडेशन अधिकारी, कर्मचारी, इंजिनीअर आणि ठेकेदार यांनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या वारंगी गावामध्ये सात वाड्यांसाठी स्वदेश फाउंडेशनमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ९४० लोक संख्या असलेल्या या गावासाठी कुटुंबांना या योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जाणार आहे. हनुमानवाडी, मलईवाडी, वलईवाडी, रामवाडी, दत्तवाडी आणि दोन बौद्धवाड्या अशा भागात हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून साठवण टाकीचे बांधकाम मुख्य पाइपलाइन आणि डिस्ट्रिब्युशन लाइनचे काम करण्यात आले आहे. यावर एकूण ३२ लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी २७ लाख स्वदेशच्या सी.एस.आर. फंडातून तर उर्वरित ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून खर्ची टाकले जाणार आहेत, अशी संपूर्ण योजना आहे.फेब्रुवारी २०१६मध्ये सुरू झालेली ही योजना अजूनही शंभर टक्के पूर्ण झालेली नाही. तपासणी परिस्थिती असतानाच पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती आढळली आहे. यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी या योजनेच्या कामावर आपला आक्षेप नोंदवला आहे. बुधवारी महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि महाड तालुका पोलीस ठाणे यांच्याकडे ६२ ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज स्वदेश फाउंडेशनच्या विरोधात दाखल केला आहे. या अर्जामध्ये गावातील भौगोलिक परिस्थिती न पाहता काम केले. कमी इंची पाइपलाइन टाकणे, पाणीटंचाई भासल्यास जबाबदारी आम्ही घेऊ, असे खोटे आश्वासन दिले. असे या अर्जात नमूद केले आहेत. या पाणीपुरवठा योजने प्रकरणी वारंगी ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वदेश फाउंडेशनमार्फत योजना राबवत असताना नवीन स्वतंत्र विहीर आणि लोखंडी पाइपलाइनचा आग्रह आम्ही केला होता. मात्र, जुन्या विहिरीवर योजना राबवित प्लास्टिकची पाइपलाइन टाकण्यात आली. २०१६च्या पावसात नदीपात्रातील पाइपलाइन नदीपात्रातील पाइपलाइन वाहून गेली असून, अनेक ठिकाणी गळती लागली आहे. स्वदेश फाउंडेशनकडे याची तक्रार केली आहे. त्याचे निराकरण व्हावे, आम्ही लोकवर्गणी भरली आहे. त्यामुळे आमची पूर्ण योजना सुस्थितीत करून देण्यात यावी.-संजना दाभोळकर, सरपंच वारंगीठरल्याप्रमाणे योजनेचे काम करण्यात आले आहे. नवीन विहीर हा विषय मंजुरीमध्ये नव्हता, तर जी. आय.पी. पाइप स्वदेश कधीच वापरत नाही. त्यामुळे सुरू असलेले काम हे नियमानुसार आहे. पाणीप्रश्न नाही, तर पाण्याचा दाब कमी-जास्त होत आहे. याबाबत बैठक घेऊन ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात पाइपलाइनच्या तपासणीचे काम सुरू करण्यात येईल. -नजीर शिक लगार,व्यवस्थापक, स्वदेश फाउंडेशन