शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

महारेलच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; महाराष्ट्र रेल्वेफाटक मुक्तीला मिळणार गती

By नारायण जाधव | Updated: September 27, 2023 19:38 IST

नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलासह राज्यातील इतर रेल्वे मार्ग आणि पायाभूत प्रकल्पांची कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने खेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा उतारा शोधला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलासह राज्यातील इतर रेल्वे मार्ग आणि पायाभूत प्रकल्पांची कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने खेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचा उतारा शोधला आहे. भूसंपादन, वित्त पुरवठा, अतिक्रमणे काढण्यासह गौण खणिज परवानग्या देणे, ट्रान्सनमशन लाईन कनेक्टीन्व्हीटीमधील अडचणी दूर करणे यासह इतर अनेक समस्या लवकरात कशा प्रकारे साेडविण्यात येतील, याची जबाबदारी या उच्चस्तरीय समितीवर राहणार आहे. या समितीत राज्याचे महसूल, वन, गृह, उद्योग, वित्त आणि नियोजन विभागाच्या सचिवांसह रेल्वेच्या मध्य, पश्चिम, दक्षिण मध्य, दक्षिण पूर्व आणि कोकण रेल्वेच्या महावस्थापकांचा समावेश आहे.

महारेलकडे आहेत ही कामेरेल्वे मंत्रालयाने महारेलकडे सोपविलेल्या महाराष्ट्रात नवीन रेल्वे लाईन टाकणे, विद्यमान रेल्वे मार्गांचे रुपांतरण/विस्तार, ओव्हर ब्रिजचे बांधकाम/रुंदीकरण, पुलाखालील रस्ता, स्टेशन इमारत, प्लॅटफॉर्म, टर्मिनल स्टेशन्सचे बांधकाम, सिग्नलिंग आणि दूरसंचार नेटवर्क. रेल्वे विद्युतीकरण अशी कामे अनेक ठिकाणी सोपविली आहेत. त्यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन, वन विभागाचे अडथळे दूर करून ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे काम या समितीकडे सोपिवले आहे.

या रेल्वे मार्गांचे काम कूर्मगतीनेराज्यात कूर्म गतीने सुरू असलेल्या पुणे नाशिक, नागपूर-नागभिड, इगतपुरी-मनमाड, सेल्वा-बुटीबोरी आणि गडचांदूर-अदिलाबाद या रेल्वे मार्गांसह अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, ठाणे, पालघर, लातूर, जळगाव व बुलढाणा येथील ११ उड्डाणपुलांची कामे नुकतीच सेतुबंधन योजनेंतर्गत सुरू केली आहेत.

सेतूबंधन योजनेंतर्गत ९१ उड्डाणपूल प्रस्तावितयाशिवाय सीआरआयएफ फंडमधून सेतूबंधन योजनेंतर्गत ९१ उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात २५ तर दुसऱ्या टप्प्यात ६६ उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात प्रामुख्याने रेल्वे फाटकांमुळे होणारे अपघात व त्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या नवीन उड्डाणपुलांमुळे रेल्वे फाटकांवरील अपघात कमी होऊन राज्याला सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहतुकीची साधने उपलब्ध होणार आहेत. या सर्वांमधील अडचणी आता ही समिती सोडविणार असल्याने त्यांच्या कामांना गती मिळणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई