शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी वाचविले १८२ कोटी

By admin | Updated: July 15, 2016 01:41 IST

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनावश्यक खर्चावर निर्बंध आणले आहेत. मोरबे धरणावर उभारण्यात येणारा वादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केला असून

नवी मुंबई : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनावश्यक खर्चावर निर्बंध आणले आहेत. मोरबे धरणावर उभारण्यात येणारा वादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केला असून पालिकेचे १६३ कोटी रूपये वाचले होते. आंबेडकर भवनच्या मूळ रचनेत बदल करून आयत्यावेळी तांत्रिकदृष्ट्या अयोग्य मार्बल आच्छादन करण्याचा निर्णय घेतला होता. १९ कोटी ३२ लाख रूपये खर्चाचा हा प्रस्तावही रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हा नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रकल्पाचे काम रखडल्याने शहरवासीयांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच आंबेडकर भवनचे काम वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्मारकाच्या मूळ कामामध्ये डोमला मार्बल आच्छादन लावण्याचे प्रस्तावित नव्हते. परंतु काही महिन्यांपूर्वी अचानक तातडीने घाईगडबडीत मार्बल लावण्याचा १९ कोटी ३२ लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहानेही स्मारकासाठी त्यास परवानगी दिली होती. परंतु भवनचे वैशिष्ट्य असणाऱ्या डोमला मार्बल तांत्रिकदृष्ट्या योग्य असणार का याविषयी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले नव्हते. आयुक्तांनी याविषयी आयआयटीकडून अहवाल मागितला असता तांत्रिकदृष्ट्या मार्बल बसविणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. सागरी वाऱ्यामुळे व वाहतूक प्रदूषणामुळे मार्बल आच्छादनामध्ये फरक पडण्याची भीती व्यक्त केली. यामुळे मार्बलऐवजी पांढरा शुभ्र रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भवनचे सौंदर्य वाढणार असून पालिकेचे १९ कोटी ३२ लाख रूपये वाचणार आहेत. महापालिकेने मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. अत्यंत घाईगडबडीत २०० कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जाणार होता. परंतु ठेकेदारानेच माघार घेतल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. यानंतर पुन्हा १६३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या कालावधीमध्ये हा प्रकल्प उभारणे आवश्यक होते. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्याचा करार महावितरणबरोबर होणे आवश्यक होते. परंतु महावितरणने वीज खरेदी करून शकत नसल्याचे स्पष्ट कळविले आहे. यामुळे हा प्रकल्प रखडला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली असता त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. पालिकेचे नुकसान होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेचे १६३ कोटी रूपये वाचणार आहेत. आयआयटीने मार्बलविषयी दिला अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नवी मुंबईमध्ये उभे राहात आहे. आयुक्तांनी स्वत: स्मारकाच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. डोमला मार्बल लावणे तांत्रिकदृष्ट्या योग्य होईल का याविषयी आयआयटीकडून अहवाल मागविला होेता. आयआयटीने पूर्ण प्रस्ताव अभ्यास करून मार्बल लावणे योग्य नसल्याचा अहवाल दिला आहे. स्मारक खाडीकिनारी आहे. सागरी वारे व हवा प्रदूषणामुळे मार्बलच्या रंगात फरक पडण्याची शक्यता आहे. मार्बल काळवंडल्याने डोमचे आकर्षण निघून जावू शकते. स्मारकाचे बांधकाम गोलाकार, निमुळते व तिरक्या आकाराचे आहे. यामुळे मार्बल बसविताना केलेले जोडकाम भविष्यात उष्णतेमुळे कमी - जास्त होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यामुळे गळती होण्याचीही शक्यता आहे. यामुळे मार्बलऐवजी पांढरा शुभ्र रंग दिला जाणार असून त्यामुळे सौंदर्यात भरच पडणार आहे. आयुक्तांनी विजेच्या धक्क्यातून वाचविलेवादग्रस्त सौरऊर्जा प्रकल्प रद्द केल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व शहरवासीयांनीही आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी सौरऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही शहरातील सामाजिककार्यकर्त्यांनी शासनाकडे धाव घेतली होती. सौरउर्जा प्रकल्प व्यवहार्य नाही. पालिकेचे १६३ कोटी रूपये पाण्यात जाणार असून तिजोरीला शॉक लागणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेवून विजेच्या धक्क्यातून पालिकेला व शहरवासीयांना वाचविले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जनतेच्या पैशाचा काटेकोर वापर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, स्मारकाच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. स्मारकाची रचना, वातावरण पाहता मार्बल योग्य होणार नसल्याचा आयआयटीचा अहवाल असल्याने ते वापरणे तांत्रिकदृष्ट्या योग्य होणार नाही यामुळे हा निर्णय घेतला आहे. मोरबे धरणावरील सौरऊर्जेचा प्रकल्प व्यवहार्य नव्हता. त्यामुळे पालिकेचे १६३ कोटी रूपये फुकट जाणार होते. जनतेच्या पैशाचा काटेकोरपणे व लोकहिताच्या कामांसाठीच वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.