शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

नोडल अधिकाऱ्यांकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:33 IST

प्रत्येक विभागाचा मूल्यांकन अहवाल तयार होणार

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले आहे. स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय अधिकारी नियुक्त केले आहेत. अधिकाऱ्यांकडून ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान सर्वेक्षण करण्यात होणार असून प्रत्येक विभागाचा मूल्यांकन अहवाल तयार केला जाणार आहे.  स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय पथकामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाण्यापूर्वी सर्वेक्षणाच्या माहिती पुस्तिकेस   अनुसरून स्वच्छतेच्या निकषांची तपासणी नोडल अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारपासून विभागीय नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रभागनिहाय पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महत्त्वकचे म्हणजे प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचे यापूर्वीचे विभाग हे  स्वच्छ सर्वेक्षण करण्याकरिता बदलण्यात आले आहेत, जेणेकरून अधिक बारकाईने परीक्षण होईल. ९ तारखेपासून १३ फेब्रुवारीपर्यंत विभागीय नोडल अधिकाऱ्यांमार्फत हे परीक्षण केले जाणार असून त्यांनी परीक्षणासाठी नेमून दिलेल्या विभागांतर्गत असलेल्या प्रभागातील स्वच्छता कामांची तपासणी सूचीनुसार (चेक लिस्ट) पाहणी करावयाची आहे. मूल्यांकन अहवाल तयार करून महापालिका आयुक्तांना सादर करायाचा आहे. त्याचप्रमाणे तपासणीदरम्यान नोडल अधिकाऱ्यांना आढळून येणाऱ्या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची १३ फेब्रुवारीपूर्वी पूर्तता करून घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.महानगरपालिकेच्या  दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी नोडल अधिकाऱ्यांनी मूल्यांकन केलेल्या प्रभागातील कामांची नमुना दाखल फेरतपासणी करावी, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान