शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:53 IST

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन प्रकल्पग्रस्तांसाठी लढा उभारण्याची ग्वाही यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.दि.बा. पाटील यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेसाठी खर्च केले. सतत ते प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढले, त्यांचे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने २५ जणांची सर्वपक्षीय कोअर कमिटी स्थापन झाली असून त्याला अनुसरून किमान १0५ जणांची सहकमिटी गठीत करण्यात येणार आहे. मुख्य कोअर कमिटीचा अध्यक्ष ही नुसती निवड नाही तर मोठी जबाबदारी मी समजतो. नुसती भाषणे करून चालणार नाही तर कमिटीत असल्याची जाणीव ठेवून सर्वांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी, लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य जवळून पहायला मिळाले आणि त्यांच्या चळवळीत सहभाग घ्यायला मिळाले त्याबद्दल ऋ णनिर्देश केले. २0१५ पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. दुर्दैवाने काही संघटना न्यायालयात गेल्या व त्या निर्णयाला स्थगिती आली असल्याचे सांगितले. विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही माझी भावना असून त्यासाठी पाठपुरावाही करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील यांनी दिबांना श्रद्धांजली वाहत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांनी सोडविणे गरजेचे आहे. अद्यापही एकही घर सिडकोने नियमित केले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली तसेच प्रकल्पग्रस्तांची घरे आहेत त्या स्थितीत नियमित केली पाहिजेत असे ते म्हणाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार मनोहर भोईर, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, पांडुशेठ घरत, आमदार बाळाराम पाटील, जे. डी. तांडेल, सुधाकर पाटील, संतोष पवार, श्रुती म्हात्रे, सुरेश ठाकूर, रवी पाटील, विजय गडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्र मास महापौर डॉ. कविता चौतमोल, दिबांचे चिरंजीव अभय पाटील, अतुल पाटील, चेतन साळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरु णशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शैक्षणिक, सामाजिक, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई