शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कांदळवन क्षेत्रातील स्वछता मोहिमेत १ टन कचऱ्याचे संकलन

By योगेश पिंगळे | Updated: April 2, 2024 16:05 IST

या स्वच्छता मोहिमेत विविध क्षेत्रातील सुमारे ६० नागरिकांनी सहभाग घेतला होता.

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नैसर्गिक आपत्तीतून शहराच्या संरक्षणासाठी मॅन्ग्रोव्ह महत्वाचे असून एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनच्या मॅन्ग्रोव्ह सोल्जर्स तर्फे नवी मुंबईतील करावे जेट्टी जवळ १८९ वी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे १ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत विविध क्षेत्रातील सुमारे ६० नागरिकांनी सहभाग घेतला होता.

खाडीकिनारी वसलेल्या मुंबई उपनगराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी कांदळवन महत्वाचे असून कांदळवन परिसरात झालेल्या अस्वच्छतेमुळे कांदळवनाची सुरक्षा धोक्यात आली आहे. पर्यावरण प्रेमी धर्मेश बराई यांनी १५ ऑगस्ट २०२० पासून कांदळवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. बराई यांच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन आजवर १८९ आठवड्याच्या स्वच्छता मोहिमेत सुमारे ५० हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

कांदळवन परिसरातील आजवरच्या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वैद्यकीय आणी कॉस्मेटिक कचरा, थर्माकोल, स्कूल बॅग, चपल, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या सुमारे  ५०० टन हुन अधिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. १८९ व्या स्वच्छता मोहिमेत क्रिकेट अंपायर असोसिएशनचे सचिव नावीद इब्राहिम आणि त्यांचे सहकारी तसेच इनरव्हील नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनचे अध्यक्ष अजितकौर ढीलॉन आणि त्यांचे सहकारी अशा तब्बल ६० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई