दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले. मात्र झाडापासून काही नुकसान झाले नाही. परंतु रात्रीच्या वेळेत वेगात असलेल्या चार गाड्या एका मागून एक आदळल्या. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी मात्र चार वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्ग जवळपास दोन तास ठप्प झाला होता.काही दिवसांपूर्वी धोकादायक झाडासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रसिध्द के लीहोती. जे झाड कोसळले त्या झाडाचे वर्णनही यामध्ये होते. मात्र महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आजही अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. तरी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वाहन चालक तसेच प्रवाशांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री दासगांव गावचे हद्दीत अनेक दिवसांपासून सुकलेल्या झाडाकडे महामार्ग अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. ते आंब्याचे झाड अचानक कोसळले. यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या.एसटी बस क्र. एमएच १४ बीटी २५५३ यावर इर्टीगा एमएच ०२ डीएन ६६४२ मागून आदळली. पुन्हा एमएच २० बीएल २४४१ परेल -भातगांव एसटी त्यामागून खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १४४० अशा चार गाड्या आदळल्या. या अपघातामध्ये जीवितहानी वा कोणीही जखमी झाले नसले तरी चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (वार्ताहर)महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. गुरु वारी कोसळलेल्या झाडाबाबत ‘लोकमत’च्या ३० मेच्या हॅलो रायगडमध्ये कोसळणाऱ्या झाडाचाच फोटो लावत धोकादायक झाडांची बातमी प्रसिद्ध केलीहोती. आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे वाहन चालक व प्रवाशांकडून महामार्ग अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून के ली जातआहे . हि धोकादायक झाडे कढावी अशी मागणी होत आहे.
महामार्गावर कोसळले झाड
By admin | Updated: June 25, 2016 02:00 IST