शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा बंद; बाजार समितीमधील व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:46 IST

शासनाने २४ डिसेंबरला आयोजित केली बैठक

नवी मुंबई : शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले हाेेते. शासनाने २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने बंदचे आयोजन केले हाेते. कामगारांचे अनेक प्रश्न १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आश्वासने दिली जात असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. मुंबई बाजार समितीच्या कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. माथाडी भवनसमोर कामगारांचा मेळावा घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले हाेते. कोरोना काळात कामगारांना विमा संरक्षण देण्यात यावे. रेल्वेचा पास देण्यात यावा. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. रेल्वे यार्डात सुविधा मिळाव्या, बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माथाडी नेेते नरेंद्र पाटील यांनी केली.कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. यामुळे बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. बैठकीत प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा परिसरातही कामगारांनी आंदोलन केले.आवक आली जावक बंद माथाडी कामगारांनी बंदचे आयोजन केल्यामुळे पाचही मार्केटचे व्यवहार बंद होते. कृषिमाल पाठविणाऱ्या काहींना बंदविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी माल विक्रीसाठी पाठविला होता. दिवसभरात पाच मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली. परंतु मार्केटमधून किरकोळ मार्केटमध्ये माल गेला नाही.शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते. राज्य सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती