शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा बंद; बाजार समितीमधील व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:46 IST

शासनाने २४ डिसेंबरला आयोजित केली बैठक

नवी मुंबई : शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले हाेेते. शासनाने २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने बंदचे आयोजन केले हाेते. कामगारांचे अनेक प्रश्न १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आश्वासने दिली जात असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. मुंबई बाजार समितीच्या कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. माथाडी भवनसमोर कामगारांचा मेळावा घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले हाेते. कोरोना काळात कामगारांना विमा संरक्षण देण्यात यावे. रेल्वेचा पास देण्यात यावा. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. रेल्वे यार्डात सुविधा मिळाव्या, बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माथाडी नेेते नरेंद्र पाटील यांनी केली.कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. यामुळे बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. बैठकीत प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा परिसरातही कामगारांनी आंदोलन केले.आवक आली जावक बंद माथाडी कामगारांनी बंदचे आयोजन केल्यामुळे पाचही मार्केटचे व्यवहार बंद होते. कृषिमाल पाठविणाऱ्या काहींना बंदविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी माल विक्रीसाठी पाठविला होता. दिवसभरात पाच मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली. परंतु मार्केटमधून किरकोळ मार्केटमध्ये माल गेला नाही.शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते. राज्य सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती