शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची कामे बंद करण्याचा डाव

By admin | Updated: February 13, 2017 05:18 IST

१९७० साली महाराष्ट्र शासनाने ठाणे, रायगड जिल्ह्यातील सुमारे ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या हजारो एकर जमिनी संपादित केल्या आणि याठिकाणी

वैभव गायकर / पनवेल १९७० साली महाराष्ट्र शासनाने ठाणे, रायगड जिल्ह्यातील सुमारे ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या हजारो एकर जमिनी संपादित केल्या आणि याठिकाणी नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले. कसत्या जमिनी सरकारने घेतल्याने याठिकाणी रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक घरातील प्रकल्पग्रस्ताला नोकरी देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. मात्र, ते पूर्ण करण्यात आले नाही. काही प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी ए-२ मार्फत कामे करण्यास सुरुवात केली. मात्र, विविध अटी, शर्थींची नियमावली आखून सिडकोकडून ए-२ची कामे बंद करण्याचा डावसध्या आखण्यात येत असून यासंदर्भात प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी एकत्र येऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे. सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जातआहे. प्रामाणिकपणे काम करूनही कामे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे खारघर नोडमध्ये प्रकल्पग्रस्त ठेकेदार संतप्त झाले आहेत. यापूर्वी पाच लाखांपर्यंतची कामे या ठेकेदारांना मिळत होती. मात्र, सरकारी नियमांत बदल करण्यात आल्याने तीन लाखांवरील सर्व कामे ई-टेंडर पद्धतीने देण्यात येतात. त्यामुळे ए-२ची कामे पाच लाखांवरून तीन लाखांपर्यंत आली. यामध्ये मजुरांची रोजंदारी, विविध कर, कामाचा दर्जा सांभाळून काम केल्यास ठेकेदाराला तुटपुंजा लाभ मिळतो. उलवे नोडमध्ये जवळ-जवळ ८० टक्के ए-२ची कामे बंद पडली आहेत. खारघरमध्ये सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून सिडकोकडून काम मिळत नसल्याने ठेकेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात पनवेल तालुका विकास समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. काही ठिकाणी उद्यान, विभाग, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाची काही कामे थेट बिगर प्रकल्पग्रस्तांना देण्यात येतात. याबाबत जाहीर निविदाही काढण्यात येत नसल्याचा आरोप पनवेल तालुका विकास समितीचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केला आहे. तर काही वेळा मुद्दाम प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या कामांची निविदा काढली जाते जेणेकरून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांमध्ये वाद निर्माण होतील, असेही प्रकार घडत आहेत.